सार्थ पंचदशी मराठी एकादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे योगानंदः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

ब्रह्मानन्दं प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन्नशेषतः ।
ऐहिकामुष्मिकानर्थव्रातं हित्वा सुखायते ॥ १ ॥

ब्रह्मवित्परमाप्नोति शोकं तरति चात्मवित् ।
रसो ब्रह्मरसं लब्ध्वाऽऽनन्दी भवति नान्यथा ॥ २ ॥
प्रतिष्ठां विन्दते स्वस्मिन् यदा स्यादथ सोऽभयः ।
कुरुतेऽस्मिन्नन्तरं चेदथ तस्य भयं भवेत् ॥ ३ ॥
वायुः सूर्यो वह्निरिन्द्रो मृत्युर्जन्मान्तरेऽन्तरम् ।
कृत्वा धर्मं विजानन्तोऽप्यस्माद्‌भीत्या चरन्ति हि ॥ ४ ॥
आनन्दं ब्रह्मणो विद्वान्न बिभेति कुतश्चन ।
एतमेव तपेन्नैषा चिन्ता कर्माग्निसम्भृता ॥ ५ ॥

एवं विद्वान्कर्मणि द्वे हित्वाऽऽत्मानं स्मरेत्सदा ।
कृते च कर्मणि स्वात्मरूपेणैवैष पश्यति ॥ ६ ॥
भिद्यते हृदयग्रन्थिश्च्छिन्द्यन्ते सर्वसंशयाः ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे ॥ ७ ॥

तमेव विद्वानत्येति मृत्युं पन्था न चेतरः ।
ज्ञात्वा देवं पाशहानिः क्षीणैः क्लेशैर्न जन्मभाक् ॥ ८ ॥

देवं मत्वा हर्षशोकौ जहात्यत्रैव धैर्यवान् ।
नैनं कृताकृते पुण्यपापे तापयतः क्वचित् ॥ ९ ॥
इत्यादिश्रुतयो बह्व्यः पुराणैः स्मृतिभिः सह ।
ब्रह्मज्ञानेऽनर्थहानिमानन्दं चाप्यघोषयन् ॥ १० ॥

एथपर्यंत विवेकपंचक आणि दीपपंचक असे दोन भाग झाले. आतां या भागांत पांच प्रकारचे आनंद सांगितले आहेत. त्यांपैकी ब्रह्मानंदाचें विवेचन आम्ही या प्रकरणांत करणार म्हणून यास ब्रह्मानंद असें नाव आम्ही ठेवतों. त्याचें चांगले ज्ञान झालें असतां या लोकींचे व परलोकींचे जे अनर्थ आहेत त्यापासून मुक्त होऊन मनुष्य आनंदरूप ब्रह्मच होतो. ॥ १ ॥
यास श्रुतीचे प्रमाण ब्रह्मवेत्त्यास परब्रह्माची प्राप्ति होते. आत्मवेत्ता शोकसागरांतून तरून जातो. हा आत्मा एक आनंदरसच आहे यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाहीं. तो मिळाला तरच प्राणी आनंदी होतो त्यावांचून होणार नाहीं. ॥ २ ॥
सद्‌गुरुकृपेनें जेव्हां यास ब्रह्मस्थिति प्राप्त होते तेव्हां तो भयरहित होतो, आणि त्यांत अंतर पडल्यास त्याला भय प्राप्त होतें. ॥ ३ ॥

“भीषास्माद्वातः पवते” या श्रुतीचाही अभिप्राय हाच आहे. तो असा कीं, वायु, सूर्य, वन्हि, इंद्र व मृत्यु ह्या ज्या पांच नियामक देवता, धर्म चांगला जाणत असूनही त्यांनीं जन्मांतरी ब्रह्मास भेददृष्टीने पाहिल्यामुळें त्याच्या भीतीनेंच आपली कामे बजावीत आहेत. ॥ ४ ॥
ब्रह्मानंद जाणणाऱ्या पुरुषाला कशाचीही भीति नाहीं. कारण भीतीला दुसरी वस्तु असली पाहिजे. परंतु तो ब्रह्मानंद अद्वैत आहे म्हणून तेथें भीतीस जागाच उरली नाहीं. अमुक पुण्य केलें नाहीं, अमुक पाप मीं केलें अशी जी कर्मजाड्याापसून होणारी चिंता ती त्यास मात्र बाधत नाहीं. इतर म्मूढांस बाधते. ॥ ५ ॥
याप्रमाणे तो तत्त्ववेत्ता पुण्यपापरूप दोन्ही कर्मांचा मिथ्यात्व अनुसंधानाने त्याग करून आत्म्याचेच स्मरण करीत बसतो. तीं केलेली पुण्यपापे आत्मरूपेंकरून तो पहातो. ॥ ६ ॥
कल्पाची कल्पे जरी गेली तरी कर्माचा क्षच भोगावांचून होतच नाहीं, असें शास्त्र आहे. त्यावरून पूर्वजन्मीची जी कांहीं अप्रसिद्ध कर्में आहेत त्यांचा क्षय केवल आत्मानुसंधानानें कसा होईल ? तो न झाल्यास चिंता तरी कशी जाईल. अशी शंका कोणाची असेल तर त्यास आम्ही हे मुंडकश्रुतीचे प्रमाण देतो. तिचा अभिप्राय असा की, पर म्हणजे हिरण्यगर्भादि ब्रह्मदेव ज्यापासून असें ब्रह्म त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला असतां हृदयाची ग्रंथी म्हणजे अन्योन्याध्यास नाहीसा होतो. आत्मा देहापासून निराळा आहे कीं नाहीं इत्यादि सर्व संशय पळून जातात. अणि सर्व पापपुण्यरूप जी कर्में त्यांचें कारण अज्ञान नष्ट झाल्यामुळे क्षय पावतात. ॥ ७ ॥
जन्मममृत्यु तरण्यास ज्ञानावांचून दुसरा मार्गच नाहीं. अशाविषयी श्वेताश्वतर शाखेमध्ये प्रमाण आहे. त्याचा अभिप्राय असा कीं, पूर्वोक्त आत्म्यास जाणणारा पुरुष मृत्यूस अतिक्रमून जातो. ज्ञानावाचून दुसरा मार्ग नाहीं. ब्रह्मज्ञान झालें असतां कामक्रोधादिक पाशाची हानी होते. हे पाश क्षीण झाले असताही पुनर्जन्म होत नाहीं. ॥ ८ ॥
ज्ञानी शोकाने तरून जातो असें म्हटलें त्यास आणखी एक दुसरे प्रमाण आहे. त्याचा अर्थ असा आहे कीं, ब्रह्मज्ञान झाले असतां धीर पुरुषाचे हर्षशोक जातात. मग त्याचें हातून पापे घडली आणि मुळें घडली नाहीत तरी त्याला ताप मुळीच होत नाहीं. ॥ ९ ॥
याप्रेमाणे ब्रह्मज्ञान झाले असतां अनर्थाची हानी होऊन आनंद प्राप्त होतो म्हणण्याविषयी पुष्कळ श्रुति स्मृति पुराणांचा डंका वाजत आहे. ॥ १० ॥

आनन्दस्त्रिविधो ब्रह्मानन्दो विद्यासुखं तथा ।
विषयानन्द इत्यादौ ब्रह्मानन्दो विविच्यते ॥ ११ ॥
भृगुः पुत्रः पितुः श्रुत्वा वरुणाद्‌ब्रह्मलक्षणम् ।
अन्नप्राणमनोबुद्धिस्त्यक्त्वाऽऽनन्दं विजज्ञिवान् ॥ १२ ॥

आनन्दादेव भूतानि जायन्ते तेन जीवनम् ।
तेषां लयश्च तत्रातो ब्रह्मानन्दो न संशयः ॥ १३ ॥

भूतोत्पत्तेः पुरा भूमा त्रिपुटीद्वैतवर्जनात् ।
ज्ञातृज्ञानज्ञेयरूपा त्रिपुटी प्रलये हि न ॥ १४ ॥

विज्ञानमय उत्पन्नो ज्ञाता ज्ञानं मनोमयः ।
ज्ञेयाः शब्दादयो नैतत्‌त्रयमुत्पत्तितः पुरा ॥ १५ ॥
त्रयाभावे तु निर्द्वैतः पूर्ण एवानुभूयते ।
समाधिसुप्तिमूर्च्छासु पूर्णः सृष्टेः पुरा तथा ॥ १६ ॥
यो भूमा स सुखं नाल्पे सुखं त्रेधा विभेदिनि ।
सनत्कुमारः प्राहैवं नारदायातिशोकिने ॥ १७ ॥

सपुराणान् पञ्च वेदान् शास्त्राणि विविधानि च ।
ज्ञात्वाऽप्यनात्मवित्त्वेन नारदोऽतिशुशोच ह ॥ १८ ॥
वेदाभ्यासात्पुरा तापत्रयमात्रेण शोकिता ।
पश्चात्त्वभ्यासविस्मारभङ्गगर्वैश्च शोकिता ॥ १९ ॥
सोऽहं विद्वान्प्रशोचामि शोकपारं नयस्व माम् ।
इत्युक्तः सुखमेवास्य पारमित्यभ्यधादृषिः ॥ २० ॥

आनंद तीन प्रकारचा. ब्रह्मानंद, विद्यानंद आणि विषयानंद. त्यांपैकीं ब्रह्मानंदाचे विवेचन प्रथमतः करतो. ॥ ११ ॥

ब्रह्म हे आनंदरूपच आहे अशाविषयी तैत्तिरीय श्रुतीचे प्रमाण आहे. त्याचा अर्थ असा कीं, -भृगुनें आपला पिता जो वरुण त्यापासून ब्रह्मलक्षण समजून घेऊन अन्न, प्राण, मन आणि विज्ञान या चार कोशांचा त्याग करून आनंदमय कोश हाच ब्रह्म आहे असें जाणता झाला. ॥ १२ ॥
कारण त्याला ब्रह्माचीं पुढें सांगितलेली सर्व लक्षणे लागतात. ज्याच्यापासून सर्व भूते होतात तें ब्रह्म. एथेही अमृतानंदापासून सर्व प्राणी होतात. जेणेकरून सर्व प्राणी वाचतात तें ब्रह्म या आनंदानेंही सर्व प्राणी वाचतात. कारण विषयोपभोगावाचून वाचणे नाहीं. आणि त्यावाचून आनंद नाहीं. जेथे सर्वांचा लय होतो तें ब्रह्म. या आनंदांतही जीवांचा लय होतो. याचा अनुभव सुषुप्तींत सर्वांस आहे. म्हणून आनंदच ब्रह्म आहे असें सिद्ध केलें. ॥१३ ॥
ब्रह्माला आनंदरूपता आहे एतद्विषयी छांदोग्य श्रुतीचेही प्रमाण आहे. त्याचा भावार्थ असा कीं, आकाशादि पंचभूतांच्या उत्पत्तीपूर्वी ज्ञातृज्ञानज्ञेय त्रिपुटीरूप द्वैत मुळींच नव्हतें. केवळ एक व्यापक आत्माच होता. कारण प्रलयकाळीं ती त्रिपुटी नाहीं असा वेदांत सिद्धांत आहे. ॥ १४॥
कारण परमात्म्यापामन उत्पन्न झालेला विज्ञानमय जो जीव तोच ज्ञाता, मन हेंच ज्ञान आणि बाकीचे सारे शब्दादिक विषय हे ज्ञेय होत. तेव्हां ही त्रिपुटी मिळून सर्व जग झालें. मग त्याचे उत्पत्तीचे पूर्वी ती त्रिपुटी नव्हती हें कांहीं सागावयास नको.॥ १५ ॥
तिहींचा अभाव झाला असतां आत्मा आपण अद्वैत परिपूर्ण राहतो. याचा अनुभव ज्ञान्यास समाधीत, आणि इतर लोकांस सुषुप्ति व मूर्च्छा या अवस्थेंत आहे. म्हणून सृष्टिपूर्वीही या त्रिपुटीचा अभाव असल्यामुळें तो आत्मा तसाच असला पाहिजे. ॥ १६॥
त्रिपुटीच्या अभावीं पूर्ण आत्मा राहतो असें सांगितलें, तेवढ्यावरून तो आनंदरूप कसा ठरतो अशी कोणी शंका घेण्याचे कारण नाहीं. कारण नारदास फार शोक झाला असतां सनत्कुमाराने असें सांगितलें कीं, “बाबारे, जें भूमा म्हणजे पूर्ण आहे, तेंच सुखरूप आहे. या त्रिपुटीने परिच्छिन्न झालेल्या अल्पामध्यें मुळींच सुख नाहीं.” ॥ १७ ॥
नारदास शोक होण्याचें कारण हेंच कीं, पुराणांसहित पांच वेद व अनेक प्रकारची सर्व शास्त्रे जाणूनही आत्मज्ञान त्यास झालें नाहीं. ॥ १८ ॥
वेदाभ्यास होण्यापूर्वी केवळ त्रिविधतापाचाच शोक होतो. नंतर अभ्यासाचे श्रमाचा शोक, विस्मरणाचा शोक, दुसऱ्यांनी केलेल्या तिरस्काराचा शोक, बरें, कदाचित् चांगले अध्ययन झालें तर गर्वाचा पुनः शोक आहेच. ॥ १९ ॥
नारदास अति शोक झालेला त्यानें सनत्कुमारास केलेल्या पुढील प्रश्नावरून समजून येतो. नारद म्हणतो महाराज, मला फार शोक होत आहे, यापासून मला पार करा. सनत्कुमार म्हणाला, बाबारे, यापासून पार होण्यास सुख म्हणजे काय हें समजले पाहिजे. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *