सार्थ पंचदशी मराठी एकादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे योगानंदः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

सुखं वैषयिकं शोकसहस्रेणावृतत्वतः ।
दुःखमेवेति मत्वाह नाल्पेऽस्ति सुखमित्यसौ ॥ २१ ॥
ननु द्वैते सुखं माभूदद्वैतेऽप्यस्ति नो सुखम् ।
अस्ति चेदुपलभ्येत तथा च त्रिपुटी भवेत् ॥ २२ ॥

मास्त्वद्वैते सुखं किन्तु सुखमद्वैतमेव हि ।
किं मानमिति चेन्नास्ति मानाकाङ्क्षा स्वयंप्रभे ॥ २३ ॥
स्वप्रभत्वे भवद्वाक्यं मानं यस्माद्‌भवानिदम् ।
अद्वैतमभ्युपेत्यास्मिन्सुखं नास्तीति भाषते ॥ २४ ॥

नाभ्युपैम्यहमद्वैतं त्वद्वचोऽनूद्य दूषणम् ।
वच्मीति चेत्तदा ब्रूहि किमासीद्‌द्वैततः पुरा ॥ २५ ॥

किमद्वैतमुत द्वैतमन्यो वा कोटिरन्तिमः ।
अप्रसिद्धो न द्वितीयोऽनुत्पत्तेः शिष्यतेऽग्रिमः ॥ २६ ॥

अद्वैतसिद्धिर्युक्त्यैव नानुभूत्येति चेद्वद ।
निर्दृष्टान्ता सदृष्टान्ता वा कोट्यन्तरमत्र नो ॥ २७ ॥

नानुभूतिर्न दृष्टान्त इति युक्तिस्तु शोभते ।
सदृष्टान्तत्वपक्षे तु दृष्टान्तं वद मे मतम् ॥ २८ ॥
अद्वैतः प्रलयो द्वैतानुपलम्भेन सुप्तिवत् ।
इति चेत्सुप्तिरद्वैतेत्यत्र दृष्टान्तमीरय ॥ २९ ॥
दृष्टान्तः परसुप्तिश्चेदहो ते कौशलं महत् ।
यः स्वसुप्तिं न वेत्त्यस्य परसुप्तौ तु का कथा ॥ ३० ॥

तें खरें सुख विषयांपासून होत नाहीं. विषयांपासून होणारे सुख विषयुक्त अन्नाप्रमाणें हजारों दुःखानी वेडलेले असल्यामुळें तें दुःख समजले पाहिजे. अशा अभिप्रायानेंच त्रिपुटीमध्यें सुख नाहीं, असें सनत्कुमारानें सांगितलें. ॥ २१ ॥
याजवर असा एक पूर्वपक्ष आहे कीं, द्वैतांत सुख नाहीं हें आम्हांस कबूल; पण तुमच्या अद्वैतांत तरी तें कुठे आहे ? जर आहे म्हणतांच, तर त्याचा अनुभव असला पाहिजे. आणि अनुभव जर असेल तर अनुभव घेणारा, आणि अनुभव घेण्याची वस्तु, ही दोन्ही असलीं पाहिजेत. तीं दोन घेतली म्हणजे पुनः त्रिपुटी येऊन अद्वैतहानि झालीच. ॥ २२ ॥
याचे उत्तर आम्ही असें देतो कीं, अद्वैत निराळेंच असून त्यात निराळें सुख आहे असें आमचे म्हणणे मुळींच नाहीं. कारण अद्वैत हेंच स्वतः सुख आहे. ही गोष्ट इतकी प्रत्यक्ष आहे कीं, तिला दुसऱ्या प्रमाणांची जरूर नाहीं. कारण तें स्वयंप्रकाश आहे. ॥ २३ ॥
त्याच्या स्वयंप्रकाशत्वाविषयीं अद्वैतांत सुख नाहीं म्हणणाराचे वाक्यच प्रमाण आहे. कारण, तो जेव्हां वाक्य बोलला तेव्हां अद्वैतांत सुख आहे किंवा नाहीं एवढीच मात्र त्यांस शंका आहे. पण अद्वैताच्या अस्तित्वाविषयी त्याला शंकाच असल्याचें दिसत नाहीं. तेव्हां प्रमाणावाचून त्याला अद्वैत भासले असें ठरतें. ॥ २४ ॥
आतां याजवर जो प्रश्न येणार तो आम्हांस माहितच आहे. तो असा कीं, आम्ही तुमचे अद्वैताचा अनुभव कबूल करीत नाहीं. अद्वैतांत सुख नाहीं असे जे म्हटले ते तुमचेच वाक्य, घेऊन म्हटलें ! तर याजवर आम्ही, असे विचारतो, द्वैताचे पूर्वी काय होते ते त्यांनींच सांगावे. ॥ २५ ॥
अद्वैत होतें. कीं द्वैत, होतें किंवा दोन्हीवाचून तिसरा कांहीं प्रकार होता. तिसरा प्रकार तर मुळींच संभवत नाहीं. कारण, अनुभवास येणाऱ्या काय त्या दोन वस्तुच द्वैत किंवा अद्वैत; यावांचून तिसरी गोष्ट मुळीच नाहीं. बरें, तेव्हां द्वैत होते असें जर म्हणावें तर द्वैताच्या पूर्वी द्वैत कसें असेल ? या रीतीनें दोन पक्षांचे खंडन झाल्यावर तिसरा पक्ष जो अद्वैत तो सहजच सिद्ध झाला. ॥ २६ ॥
ही अद्वैत-सिद्धि युक्तीनें सिद्ध करून आमचे तोंड बंद केलें. अनुभवास येत नाहीं असा आरोप पुनः आमचेवर येणारच; तर त्याजवर आम्ही असें विचारतो कीं, ती युक्ति दृष्टांतपूर्वक आहे कीं, अदृष्टांतपूर्वक आहे ? ह्यापैकी एक प्रकार असला पाहिजे. तिसरा प्रकार मुळीच संभवत नाहीं. ॥ २७ ॥
अनुभव तर नाहींच आणि दृष्टांतावांचून तर युक्ति सिद्ध हात नाहीं ? म्हणून युक्तीला दृष्टांत पाहिजे असें झालें. तो दृष्टांत उभय वाद्यांस मान्य असला पाहिजे. असा दृष्टांत कोणचा तो सांगा. ॥ २८ ॥
यास दृष्टांत प्रलयाचाच चांगला आहे. कारण, तेथें द्वैत नाहीं, जेथे द्वैत नाहीं तें अद्वैत. जशी निद्रा. आतां आम्ही पुसतो कीं निद्रा तरी अद्वैत कशावरून ? त्यास, पुनः एक उदाहरण पाहिजे. दुसऱ्याचे निद्रेचे ते उदाहरण देतील तर त्यांचें मोठे पांडित्यच समजले पाहिजे. कारण ज्याला स्वतःची निद्रा समजत नाहीं, त्याला दुसऱ्याची कशी समजेल ? ॥ २९-३० ॥

निश्चेष्टत्वात्परः सुप्तो यथाहमिति चेत्तदा ।
उदाहर्तुः सुषुप्तेस्ते स्वप्रभत्वं बलाद्‌भवेत् ॥ ३१ ॥
नेन्द्रियाणि न दृष्टान्तस्तथाप्यङ्गीकरोषि ताम् ।
इदमेव स्वप्रभत्वं यद्‌भानं साधनैर्विना ॥ ३२ ॥
स्तामद्वैतस्वप्रभत्वे वद सुप्तौ सुखं कथम् ।
शृणु दुःखं तदा नास्ति ततस्ते शिष्यते सुखम् ॥ ३३ ॥

अन्धः सन्नप्यनन्धः स्याद्विद्धोऽविद्धोऽथ रोग्यपि ।
अरोगीति श्रुतिः प्राह तच्च सर्वे जना विदुः ॥ ३४ ॥
न दुःखाभावमात्रेण सुखं लोष्टशिलादिषु ।
द्वयाभावस्य दृष्टत्वादिति चेद्विषमं वचः ॥ ३५ ॥
मुखदैन्यविकासाभ्यां परदुःखसुखोहनम् ।
दैन्याद्यभावतो लोष्टे दुःखाद्यूहो न सम्भवेत् ॥ ३६ ॥

स्वकीयसुखदुःखे तु नोहनीये ततस्तयोः ।
भावो वेद्योऽनुभूत्यैव तदभावोऽपि नान्यतः ॥ ३७ ॥
तथा सति स्वसुप्तौ च दुःखाभावोऽनुभूतितः ।
विरोधिदुःखराहित्यात्सुखं निर्विघ्नमिष्यताम् ॥ ३८ ॥
महत्तरप्रयासेन मृदुशय्यादिसाधनम् ।
कुतः सम्पाद्यते सुप्तौ सुखं चेत्तत्र नो भवेत् ॥ ३९ ॥
दुःखनाशार्थमेवैतदिति चेद्‌रोगिणस्तथा ।
भवत्वरोगिणस्तेतत्सुखायैवेति निश्चिनु ॥ ४० ॥

याजवरही त्याचें उत्तर आहेंच; तें हे कीं, दुसरा निचेष्ट झाला म्हणजे तो निजला असें समजावे. तें तरी कशावरून समजले असें आम्ही विचारणारच. त्याचें उत्तर आपल्या अनुभवावरून दुसऱ्याची निद्रा. तेव्हां अर्थातच स्वप्रभत्व ‘कबूल करणें भाग पडलें. ॥ ३१ ॥
कारण सुषुप्तीचे ज्ञान करून देण्याला इंद्रियादि इतर साधनेही नाहींत, व दृष्टांतही नाहीं. असें असून सुषुप्ती समजली म्हणतात, तेव्हां अर्थातच ती स्वयंप्रकाश असें ठरले. साधनावाचून जें ज्ञान तेंच स्वयंप्रकाश. ॥ ३२ ॥
याप्रमाणे सुषुप्ति अद्वैत असून स्वयंप्रकाश आहे असें सिद्ध झालें; परंतु तेथें सुख आहे किंवा नाही ही अद्यापि शंका राहिलीच. या शंकेचा परिहार हा कीं, जेथे दुःख नाहीं तेथें सुख असलेंच पाहिजे. निद्रेतील दुःखाभावाचा अनुभव सर्वांस आहे. तेव्हां अर्थातच बाकी सुख राहिलें. ॥ ३३ ॥
यास श्रुतीचे प्रमाण असें आहे कीं, निद्रेमध्ये देहाभिमान लीन झाल्यामुळे मनुष्यास आपण आंधळा, जखमी किंवा रोगी असूनही त्याचें भान त्याला काहीच नसते. असा प्रत्येक मनुष्याचा अनुभवही आहे. ॥ ३४ ॥
याजवर कोणी म्हणेल कीं, दुःख नाहीं एवढ्याचमुळें सुखाचे अस्तित्व सिद्ध होत नाहीं. कारण, लोष्टशिलादिकांचे ठायीं त्या दोहींचाही अभाव आहें ? पण हा दृष्टांतच बरोबर नाहीं. ॥ ३५ ॥
कारण, दुसऱ्याचे सुखदुःखाचें जे अनुमान करावयाचें तें केवळ त्याचे मुद्रेवरून. मुद्रा प्रफुल्लित असली तर त्यास सुख झालें आहे, व ती म्लान असली तर दुःख झाले आहे असें समजावयाचे; पण तूं जो लोष्टाचा दृष्टांत दिलास तेथें दुःखादिकाचें अनुमान करण्यास मार्गच नाही. ॥ ३६ ॥
दुसऱ्याचे सुखदुःख असें अनुमानाने समजावयाचे तसें स्वकीय सुखदुःख समजण्यास अस्तित्व जसे अनुभवाने समजते तसा त्यांचा अभावही अनुभवानेच समजतो. दुसऱ्या प्रमाणाची जरूर नाहीं. ॥ ३७ ॥
याकरितां आपल्या निद्रेमधील दुःखाभाव ज्याअर्थी अनुभवाने समजतो त्याअर्थी विरोधि दुःखाच्या अभावामुळे राहिलेले सुख अनुभवास आलेंच पाहिजे. ॥ ३८॥
निद्रेत जर सुख नसेल तर मोठ्या: प्रयासानें मऊ गाद्या गिर्द्या इत्यादिक साधने करण्याच्या खटपटींत मनुष्य कशाला पडता ? ॥ ३९ ॥

तो जी खटपट करतो ती केवळ दुःखनिवारणार्थ; तेथें कांहीं नवीन सुखाची प्राप्ति नाहीं; अशी शंका कोणी घेऊ नये. कारण, ती गोष्ट कदाचित् रोग्याला लागू पडेल. पण धड-धाकड मनुष्य देखील जो इतका त्या साधनार्थ प्रयत्न करतो त्या अर्थीं तो सुखार्थच असला पाहिजे यातसंशय नाहीं. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *