सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १०१ ते १२०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
सार्थ पंचदशी सूची

वेदान्तानामशेषाणामादिमध्यावसानतः ।
ब्रह्मात्मन्येव तात्पर्यमिति धीः श्रवणं भवेत् ॥ १०१ ॥
सर्व वेदांतांतील वाक्याचें पर्यवसान ब्रह्मरूप जो प्रत्यगात्मा त्यावरच आहे. असा जो बुद्धीचा निश्वय होणें, त्यालाच श्रवण असें म्हणसात. ॥ १०१ ॥

समन्वयाध्याय एतत्सूक्तं धीस्वास्थ्यकारिभिः ।
तर्कैः सम्भावनाऽर्थस्य द्वितीयाध्यायः ईरिता ॥ १०२ ॥
हें श्रवण व्यासांनी शारीर भाष्याच्या पहिल्या समन्वय अध्यायांत सांगितलें आहे; आणि दुसरे अध्यायांत मनाचें समाधान करणार्‍या नानाप्रकार-च्या तर्कयुक्ति सांगून अर्थसंभावनारूप मनन सांगतिले आहे. ॥ १०२ ॥

बहुजन्मदृढाभ्यासाद्देहादिष्वात्मधीः क्षणात् ।
पुनः पुनरुदेत्येवं जगत्सत्यत्वधीरपि ॥ १०३ ॥
अनेक जन्मांच्या दृढाभ्यासाने देहादिकांचेठायी पुन: पुन: अहंबुद्धि आणि जगाविषयीं सत्यत्व बुद्धि होते. हीच विपरीत भावना. ॥ १०३ ॥

विपरीता भावनेयमैकाग्र्यात्सा निवर्तते ।
तत्त्वोपदेशात् प्रागेव भवत्येतदुपासनात् ॥ १०४ ॥
मनाचें ऐकाग्र्य केल्यानें ही विपरीत भावना नाहीशी होते ते ऐकाग्र्य तत्त्वोपदेशापूवींच सगुणुबह्योपासनेनें होतें. ॥ १०४ ॥

उपास्तयोऽत एवात्र ब्रह्मशास्त्रेऽपि चिन्तिताः ।
प्रागनभ्यासिनः पश्चाद्‌ब्रह्माभ्यासेन तद्‌भवेत् ॥ १०५ ॥
वेदांत व शास्त्रांत उपासनेचा विचार सांगितला आहे. पूर्वी ज्यांनीं ऐकाग्र्याचा अभ्यास केला नाहीं त्यांना ते मागून ब्रह्माभ्यासाच्या योगानें प्रास होतें. ॥ १०५ ॥

तच्चिन्तनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनम् ।
एतदेकपरत्वं च ब्रह्माभ्यासं विदुर्बुधाः ॥ १०६ ॥
सर्वदा बह्यतत्त्वाचेंच चिंतन, त्याचेंच कथन त्याचाच परस्परांस बोध, व त्यावाचून दूसरा विषयच नाहीं, असा जो अभ्यास त्यास ब्रह्माभ्यास म्हणतात. ॥ १०६ ॥

तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः ।
नानुध्यायाद्‌बहुञ्छब्दान्वाचो विग्लापनं हि तत् ॥ १०७ ॥
श्रुतीत असें सांगितले आहे कीं, त्या आत्म्याचें ज्ञान झाल्यावर धीर मुमुक्षूनें तेच तत्त्व बुद्धींत ठसवावे. बहु शब्दजल्पनानें वाणीला शीण मात्र होतो. म्हणून फार बोलू नये. ॥ १०७ ॥

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ १०८ ॥
‘जे लोक अनन्यभावेंकरून माझ्या स्वरूपाचें ध्यान करून माझी उपासना करतात, त्या भक्तांचा सतत योगक्षेम मी चालवितो’ या गीतावाक्याचेंही तात्पर्य हेंच आहे. ॥ १०८ ॥

इति श्रुतिस्मृती नित्यमात्मन्येकाग्रतां धियः ।
विधत्तो विपरीताया भावनायाः क्षयाय हि ॥ १०९ ॥
याप्रमाणें श्रुतिस्मृतीमध्यें विपरीतभावनानिवृत्यर्थ आत्म्याचेठायीं चित्ताची एकाग्रता सांगितली आहे. ॥ १०९ ॥

यद् यथा वर्तते तस्य तत्त्वं हित्वान्यथात्वधीः ।
विपरीत भावना स्यात्पित्रादावरिधीर्यथा ॥ ११० ॥
जी वस्तु जशी आहे तशी न समजतां अन्य प्रकारें समजणें यालाच विपरीत भावना म्हणतात. उदाहरण, बाप, आई, बंधु इत्यादिकांस शत्रुबुद्धीनें पाहणे ही विपरीत भावना आहे. ॥ ११० ॥

आत्मा देहादिभिन्नोऽयं मिथ्या चेदं जगत् तयोः ।
देहाद्यात्मत्वसत्यत्वधीर्विपर्ययभावना ॥ १११ ॥
हे विपरीत भावनेचें लक्षण प्रकृत विषयास बरोबर लागू पडतें. आत्मा देहादिकांपासून भिन्न व जग मिथ्या असून, देहच आत्मा, आणि जग सत्य, असे आम्ही विपरीत मानतो. ॥ १११ ॥

तत्त्वभावनया नश्येत्साऽतो देहातिरिक्तताम् ।
आत्मनो भावयेत्तद्वन्मिथ्यात्वं जगतोऽनिशम् ॥ ११२ ॥
ही विपरीत भावना खर्‍या तत्त्वाच्या भावनेच्या यो-गाने नाश पात्रते. यास्तव आत्मा देहाहून भिन्न आहे व जग मिथ्या आहे या गोष्टीचा मनामध्ये निरंतर खल करावा. ॥ ११२ ॥

किं मन्त्रजपवन्मूर्तिध्यानवद्वाऽऽत्मभेदधीः ।
जगन्मिथ्यात्वधीश्चात्र व्यावर्त्या स्यादुतान्यथा ॥ ११३ ॥
याजवर असा एक प्रश्न आहे कीं देहापासून आत्म्याचे भिन्नत्व आणि जगाचे मिथ्यात्व या खर्‍या तत्त्वाची भावना करावी म्हणून वर सांगितलें. ही भावना काम, जप, मंत्र, किंवा मूर्तिध्यानाप्रमाणें नियमानें केली पाहिजे की कशीही केली तरी चालेल ? ॥ ११३ ॥

अन्यथेति विजानीहि दृष्टार्थत्वेन भुक्तिवत् ।
बुभुक्षुर्जपवद्‌भुङ्क्ते न कश्चिन्नियतः क्वचित् ॥ ११४ ॥
उत्तर. यास नियमाची गरज नाहीं, कारण भोज-नाप्रमाणें त्या भावनेचें फळ प्रत्यक्ष आहे. जपाप्रमाणे भोजनांत नियम कोणीही राखीत नाहीं. ॥ ११४ ॥

अश्नाति वा न वाश्नाति भुङ्क्ते वा स्वेच्छयाऽन्यथा ।
येन केन प्रकारेण क्षुधामपनिनीषति ॥ ११५ ॥
मनुष्य मूक असेल तर जेवतो, नसेल तर जेवीत नाही. कदाचित जेवला तरी अमूकच नियम धरून तो जेवतो असे नाही. कोणत्याही प्रकारे तो आपल्या क्षुधेचें निवारण करतो. नियम परलोकाकरतां आहेत. क्षुधा घालविण्यास त्याची गरज नाही ॥ ११५ ॥

नियमेन जपं कुर्यादकृतौ प्रत्यवायतः ।
अन्यथाकरणेऽनर्थः स्वरवर्णविपर्ययात् ॥ ११६ ॥
परंतु जपाचा प्रकार तसा नाहीं, तो नियमानेंच केला पाहिजे. तसा न केल्यास प्रत्यवाय आहे. आणि भलत्या रीतीने केल्यास स्वरवणार्चा विपर्यय होऊन त्यापासून अनर्थप्राप्ति होते ॥ ११६ ॥

क्षुधेव दृष्टबाधाकृद्विपरीता च भावना ।
जेया केनाप्युपायेन नास्त्यत्रानुष्ठितेः क्रमः ॥ ११७ ॥
वर सांगितलेली विपरीत भावना क्षुधेप्रमाणे प्रत्यक्ष बाधा करणारी आहे म्हणून तिच्या अनुष्ठानाला अमुकच क्रम नाहीं. कोणत्याही उपायेंकरून तिचा नाश केला म्हणजे झाले. ॥ ११७ ॥

उपायः पूर्वमेवोक्तस्तच्चिन्ताकथनादिकः ।
एतदेकपरत्वेऽपि निर्बन्धो ध्यानवन्न हि ॥ ११८ ॥
जो उपाय आम्ही सर्वदा आत्मचिंतन कथनरूप पूर्वींच सांगितला आहे, तदेकपरत्व म्हणून आम्हीं ब्रह्माभ्यासांत सांगितलें त्याला ध्यानासारखा निबंध नाहींत ॥ ११८ ॥

मूर्तिप्रत्ययसान्तत्यमन्यानन्तरितं धियः ।
ध्यानं तत्रातिनिर्बन्धो मनसश्चञ्चलात्मनः ॥ ११९ ॥
दुसरी कोणतीही कल्पना मध्ये आड न येतां एक सारखी एकाच मूर्तीची जी भावना तिला ध्यान म्हणतात. मन अतिशय चंचल असल्यामुळें ध्यानाला निर्बंध अवश्य आहें. ॥ ११९ ॥

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ १२० ॥
मनाच्या चंचलतेविषयी गीतेंत अर्जुनाने असें म्हटलें आहे की, हे कृष्णा, हें मन इतके चंचल, हट्टी व ओढ घेणारे आहे कीं, त्याचा निग्रह मला वायुनिग्रहाप्रमाणें कठिण वाटतो. ॥ १२० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading