सार्थ पंचदशी मराठी एकादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे योगानंदः श्लोक ६१ ते ८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

ब्रह्मविज्ञानमानन्दमिति वाजसनेयिनः ।
पठन्त्यतः स्वप्रकाशं सुखं ब्रह्मैव नेतरत् ॥ ६१ ॥
यदज्ञानं तत्र लीनौ तौ विज्ञानमनोमयौ ।
तयोर्हि विलयावस्था निद्राज्ञानं च सैव हि ॥ ६२ ॥
विलीनघृतवत्पश्चात्स्याद्विज्ञानमयो घनः ।
विलीनावस्थ आनन्दमयशब्देन कथ्यते ॥ ६३ ॥
सुप्तिपूर्वक्षणे बुद्धिवृत्तिर्या सुखबिम्बिता ।
सैव तद्‌बिम्बसहिता लीनानन्दमयस्ततः ॥ ६४ ॥
अन्तर्मुखो य आनन्दमयो ब्रह्मसुखं तदा ।
भुङ्क्ते चिद्‌बिम्बयुक्ताभिरज्ञानोत्पन्नवृत्तिभिः ॥ ६५ ॥
अज्ञानवृत्तयः सूक्ष्मा विस्पष्टा बुद्धिवृत्तयः ।
इति वेदान्तसिद्धान्तपारगाः प्रवदन्ति हि ॥ ६६ ॥
माण्डुक्यतापनीयादिश्रुतिष्वेतदतिस्फुटम् ।
आनन्दमयभोक्तृत्वं ब्रह्मानन्दे च भोग्यता ॥ ६७ ॥
एकीभूतः सुषुप्तस्थः प्रज्ञानघनतां गतः ।
आनन्दमय आनन्दभुक् चेतोमयवृत्तिभिः ॥ ६८ ॥
विज्ञानमयमुख्यैर्यो रूपैर्युक्तः पुराऽधुना ।
स लयेनैकतां प्राप्तो बहुतण्डुलपिष्टवत् ॥ ६९ ॥
प्रज्ञानानि पुरा बुद्धिवृत्तयोऽथ घनोऽभवत् ।
घनत्वं हिमबिन्दूनामुदग्देशे यथा तथा ॥ ७० ॥

हे स्वप्रकाश सुखच ब्रह्म आहे अशाविषयीं “ब्रह्म विज्ञानमानंदम् ” म्हणजे ज्ञानरूप आनंदच ब्रह्म आहे असें वाजसनीय शाखेत म्हटलें आहे. ॥ ६१ ॥
हा जो सुखज्ञानाचा अनुभव आम्ही सांगितला तो विज्ञानमय शब्दवाच्य जीवाला आहे अशी कोणी शंका घेऊं नये. कारण त्या अज्ञानांतच विज्ञानमय आणि मनोमय, हे दोघेही लीन होतात. त्यांची जी विलयावस्था तीच निद्रा आणि तेंच अज्ञान. ॥ ६२ ॥
ज्याप्रमाणें उष्णतेच्या संयोगाने पातळ झालेलें तूप पुनः घट्ट होते त्याप्रमाणें जागृत्स्वप्नावस्थेतील भोगप्रद कर्माचा क्षय झाला असतां लीन झालेलें अंतःकरण पुनः कर्मवशात् जागृत होऊन विज्ञानमय होतें. या विलीनावस्थेलाच आनंदमय असें नांव दिलें आहे. ॥ ६३ ॥
म्हणजे निद्रेच्या पर्वूक्षणी जी वृत्ति बाहेरचे जग. सोडून स्वरूपाकडे वळण्यानें स्वरूपसुखांत निमग्न होऊन लीन होते. या अवस्थेला आनंदमय कोश म्हणतात. ॥ ६४ ॥
असा हा अंतर्मुखवृत्तीचा परिणामरूप आनंदमय कोश त्यावेळीं ब्रह्मसुखाचा उपभोग घेतो. त्या काळी त्या सुखानें बिंबित अशा अज्ञानवृत्ति असतात, त्यामुळें भोग घडतो. ॥ ६५ ॥
त्या अज्ञानवृत्ति सूक्ष्म म्हणजे अस्पष्ट आहेत आणि बुद्धिवृत्ति त्यांपेक्षा स्पष्ट आहेत असें वेदातसिद्धातपारग पुरुष म्हणतात. ॥ ६६ ॥

ही गोष्ट मांडूक्य तापनीयादि श्रुतीमध्ये स्पष्ट करून सांगितली आहे. तेथे असें झटले आहे कीं, आनंदमय हा भोक्ता आहे. आणि ब्रह्मानंद हे त्याचें भोग्य आहे. ॥ ६७ ॥
मांडुक्य श्रुतीतील ” प्रज्ञानघनैव आनंदमयः ” इत्यादि वाक्यांचा अर्थ असा कीं, विज्ञानमय वाच्य जीव सुषुप्तीमध्ये स्वरूपाशी ऐक्य पावून आनंदमय होऊन चैतन्य प्रतिबिंबित वृत्तीच्या योगाने तेथील ब्रह्मानंदाचा भोग घेतो. ॥ ६८ ॥
ऐक्य पावतो म्हणून जें वर म्हटलें त्याचा अर्थ असा की, पूर्वी जो विज्ञानमय आदिकरून रूपांनी युक्त होतो; तोच आतां पुष्कळ तांदुळांच्या पिठाप्रमाणें त्या सर्व रूपाच्या लयाशीं ऐक्य पावतो. ॥ ६९ ॥
ज्याप्रमाणें थंड देशांत पाणी घट्ट होतें तसें घटादिक ज्या बुद्धिवृत्ति ज्यास प्रज्ञान असें म्हणतात त्या सुषुप्तींत घट्ट होतात. तेव्हां तो चिद्‌रूपाशी ऐक्य पावतो. ॥ ७० ॥

तद्घनत्वं साक्षिभावं दुःखाभावं प्रचक्षते ।
लौकिकास्तार्किका यावद्दुःखवृत्तिविलोपनात् ॥ ७१ ॥
अज्ञानबिम्बिता चित्स्यान् मुखमानन्दभोजने ।
भुक्तं ब्रह्मसुखं त्यक्त्वा बहिर्यात्यथ कर्मणा ॥ ७२ ॥
कर्म जन्मान्तरेऽभूद्यत्तद्योगाद्बुद्ध्यते पुनः ।
इति कैवल्यशाखायां कर्मजो बोध ईरितः ॥ ७३ ॥
कंचित्कालं प्रबुद्धस्य ब्रह्मानन्दस्य वासना ।
अनुगच्छेद्यतस्तूष्णीमास्ते निर्विषयः सुखी ॥ ७४ ॥
कर्मभिः प्रेरितः पश्चान्नाना दुःखानि भावयन् ।
शनैर्विस्मरति ब्रह्मानन्दमेषोऽखिलो जनः ॥ ७५ ॥
प्रागूर्ध्वमपि निद्रायाः पक्षपातो दिने दिने ।
ब्रह्मानन्दे नृणां तेन प्राज्ञोऽस्मिन्विवदेत कः ॥ ७६ ॥

ननु तूष्णीं स्थितौ ब्रह्मानन्दश्चेद्‌भाति लौकिकाः ।
अलसाश्चरितार्थाः स्युः शास्त्रेण गुरुणात्र किम् ॥ ७७ ॥
बाढं ब्रह्मेति विद्युच्चेत्कृतार्थास्तावतैव ते ।
गुरुशास्त्रे विनाऽत्यन्तं गम्भीरं ब्रह्म वेत्ति कः ॥ ७८ ॥
जानाम्यहं त्वदुक्त्याद्य कुतो मे न कृतार्थता ।
शृण्वत्र त्वादृशं वृत्तं प्राज्ञं मन्यस्य कस्यचित् ॥ ७९ ॥

चतुर्वेदविदे देयमिति शृण्वन्नवोचत ।
वेदाश्चत्वार इत्येवं वेद्मि मे दीयतां धनम् ॥ ८० ॥

ज्याला वेदांतशास्त्रांत प्रज्ञानघन साक्षी असें म्हटलें त्यालाच बाकीचे साधारण लोक व तार्किकादिक पंडित दुःखाभाव असें म्हणतात. कारण निद्रेत सर्व दुःखवृत्तीचा लोप होतो. ॥ ७१ ॥
या आनंदभोगांना अज्ञानप्रतिबिंबित चैतन्य साधन आहे, अशी एकदा ज्याची रुचि घेतली आहें असें जें ब्रह्मसुख तें सोडून देऊन जीव बाहेर येतो त्याला कारण त्याचें कर्मच. ॥ ७२ ॥
पूर्व जन्मी केलेल्या कर्मामुळेच पुनः जागा होतो, असें जागृतीस कर्मच कारण आहे; असें कैवल्यशाखेंत म्हटलें आहे. ॥ ७३ ॥

मनुष्य जागा झाल्यानंतर कांहीं वेळपर्यंत निद्रेत भोगलेल्या- ब्रह्मानंदाचा ठसा असतो. ही एक आनंद भोगल्याची खुणाच आहे. कारण; त्यावेळी अंथरुणावर पडलेला असतां मनामध्ये कोणचाही विषय नसता सुखी असतो. ॥ ७४ ॥
तो तसाच सुखानें स्वस्थ पडून राहता. परंतु कर्माहींकरून प्रेरित होत्साता नानाप्रकारचीं दुःखे मनांत येऊन हळूहळू त्यास ब्रह्मानंदाची विस्मृति पडते. ॥ ७५ ॥
निद्रेच्या पूर्वी व तिच्या अंती काहीवेळ ब्रह्मानंदाविषयींची प्रीति असलेली मनुष्यास दृष्टीस पडते. कारण पूर्वी तो आनंद भोगण्याकरितां मृदु शय्यादि साधनांचा प्रयत्न, वअंती हांतरूण सोडून उठण्याचा कंटाळा, ह्या दोन गोष्टींवरून हें सिद्ध होतें. तेव्हां या निद्रेत ब्रह्मानंद आहे याविषयी सुज्ञांस संशय कधी येईल काय ? ॥ ७६ ॥
आजवर असा एक पूर्वपक्ष आहे कीं, सुषुप्तीच्या आदि अंतीच्या तुष्णी स्थितींत ब्रह्मानंद भासतो. असे जर मानले तर काही खटपट न करिता मनुष्यास मोक्षप्राप्ति होईल; मग गुरु आणि शास्त्र यांची गरज काय ? ॥ ७७ ॥
खरें आहे. परंतु ब्रह्माचें ज्ञान जर होईल तर तेवढ्यानेंच ते कृतार्थ होतील. पण गुरुशास्त्रांचे साहाय्यावाचून तें ज्ञानच होत नाहीं ॥ ७८ ॥
तुमच्या सांगण्यावरूनच तेच, ब्रह्म असे आम्हांस समजले असून आम्हांस कृतार्थता कां वाटत नाही ? असा प्रश्न आमच्या वरील उत्तरावर कोणी करीत असल तर त्या प्रश्न करणाऱ्या मनुष्यासारख्या कोणी एका तत्त्वज्ञ म्हणून घेणाराची एक गोष्ट आम्ही सांगतो ॥ ७९ ॥
कोणी एका राजानें वर्तमानपत्रांत अशी जाहिरात दिली की, जो कोणी चार वेद जाणता असेल त्यास हजार रुपयांचे बक्षीस दिलें जाईल. ही जाहिरात वाचून कोणी एक भट्ट ब्राम्हण राजाकडे येऊन म्हणाला. वेद चार आहेत हेमी पक्के जाणतो. तर जाहीर केलेलें बक्षीस मला देण्याची आज्ञा व्हावी. ॥ ८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *