ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.211

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २११

एका पांडुरंगे नव्हेचि पै जोडी । दया गेले ठायां मज आला राहावया । मत्सर गिळावया कुलासहित ॥ क्षमा गेली परती अहंकार सांगती ।

ते ओढूनियां नेती अघोरासी ॥ गति म्हणे मी थोरी प्रवृत्ति निघाला घोरी । राहो न शके घरी निवृत्ती तेथें ॥ ज्ञानदेवो सांगे असे मज पांडुरंगे । लक्ष्मीये रिघे शरण आडवा ॥

अर्थ:-

आसुरी संपत्तीने युक्त होऊन केल्या जाणार्या पांडुरंगाच्या नुसत्या भक्तिने म्हणजे दैवी संपत्तीने रहित असलेल्या भक्तिने मोक्ष प्राप्त होणार नाही. उलट कुलनाशक मद मत्सर येऊन राहतात.

मनातील क्षमा जाऊन त्या ठिकाणी अहंकार आला तर जीवाला अघोरी नरक प्राप्त होतो. जेथे वैराग्य निवृत्ती नाही तेथे तेथे प्रवृत्तीला अघोराची गती मिळते. तसे असेल तर लक्ष्मी दैवी संपत्तीसह पांडुरंगाला तुमच्या साठी आडवुन ठेवते असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *