ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.210

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१०

दीपी दीप सामावे तेथे कैचा विचारू । राहिला निर्धारु नाना मत्ता ॥ जे जेथे होतें तेंचि तेथे नाही । परतोनि कांही पाहातोसी ॥

मौन्याचिये मिठी सगळोंचि नाहीं । तैसा इंद्रिये दाही चोजवेना ॥ ज्ञानदेवो बोले सामावलें मन । मग नायकतो कान तेथील कथा ॥

अर्थ:-

परमात्म्याचे प्रतिपादन करणारी अनेक मते आहेत. पण ज्योतीत ज्योत मिळावी त्या प्रमाणे गुरूकृपेने आल्याचे ब्रह्मत्वाने ज्ञान झाल्यानंतर बाकीचे मते जागच्या जागी निवांत राहिली. जे जेथे होते ते तेथे नाही

परतुन काय पाहतोस. तशी आत्मस्थिती स्थिती पडली मौनाची मिठी पडली की तो विषयांना इंद्रिय विषय नाही. शब्दासह मन परमात्म स्वरूपात लीन झाल्यानंतर प्रपंचाची कथा कान ऐकणार नाहीत असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *