ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.210
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१०
दीपी दीप सामावे तेथे कैचा विचारू । राहिला निर्धारु नाना मत्ता ॥ जे जेथे होतें तेंचि तेथे नाही । परतोनि कांही पाहातोसी ॥
मौन्याचिये मिठी सगळोंचि नाहीं । तैसा इंद्रिये दाही चोजवेना ॥ ज्ञानदेवो बोले सामावलें मन । मग नायकतो कान तेथील कथा ॥
अर्थ:-
परमात्म्याचे प्रतिपादन करणारी अनेक मते आहेत. पण ज्योतीत ज्योत मिळावी त्या प्रमाणे गुरूकृपेने आल्याचे ब्रह्मत्वाने ज्ञान झाल्यानंतर बाकीचे मते जागच्या जागी निवांत राहिली. जे जेथे होते ते तेथे नाही
परतुन काय पाहतोस. तशी आत्मस्थिती स्थिती पडली मौनाची मिठी पडली की तो विषयांना इंद्रिय विषय नाही. शब्दासह मन परमात्म स्वरूपात लीन झाल्यानंतर प्रपंचाची कथा कान ऐकणार नाहीत असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य
ईतर लेख, गोसावी-बैरागी-संन्यासी\, ग्रंथाचे प्रश्नोत्तरे, ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, प्रश्नोत्तर सूची, वैदिक-हिंदू संस्कृती, संत ज्ञानेश्वर चरित्र, संत ज्ञानेश्वर म. संपूर्ण चरित्र सूची, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, संत तुकाराम संपूर्ण, संत नामदेव संपूर्ण, संत समाधी अभंग, संत सोपान काका संपूर्ण, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची