ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.192

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९२

विटंबुनी काया दंड धरी करीं । हिंडे घरे चारी नवल पाहें । असमाधानी विषयी विव्हळ । तरी केवळ दंड काजा काई ॥ सिद्धचि असतां कां गा विटंबिसी । नव्हेचि संन्यासी तू जाण कैसा ॥ निजाश्रमींचे वास संकल्पासी त्यागी । सर्वस्वे वैरागी तोचि संन्यासी ।

संगी असंगता तोचि जाण संन्यासी । स्वरूपतयापाशी जवळी आहे ॥ बापरखुमादेविवरू उघडाचि संन्यासी । तोचि पूर्ण भासीं भरला असे । निवृत्तीरायें खुणा दाखविला निरूता । जो जाणण्यापरतां सदोदितु ॥

अर्थ:-

संन्यासी होणे म्हणजे देहाला दंडित करुन हातात दंड घेऊन चार घरी भिक्षा मागणे नव्हे. विषय वासनांचा त्याग करणे म्हणजे संन्यास होय. त्यासाठी दंड, कमंडलु वगैरे कामाचे नाहीत. तु स्वतः स्वरुप सिध्द असल्याने देहाची विटंबना करुन संन्यास का घेतोस?

ज्यांने विहित आश्रमापणे वागले व संकल्पाचा त्याग केला की ते वैराग्यच होते वेगळे संन्यासी होण्याची गरज नाही. ज्याने विषयसंगाशी असंग केला तोच खरा स्वरुपाने संन्यासी झाला हे जाण. संसारात राहुन विषयांपासुन विरक्त झाला तोच खरा संन्यासी आहे हे जाण.

माझे पिता व रखुमाईचे पती यांनी तो खरा संन्यास सांगितला व निवृत्तिनाथांनी त्याची खुण दाखवली व त्यामुळे ती अवस्था सदोदित प्राप्त झाली असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *