बाराखडीचा नवीन अर्थ
किती सुंदर बाराखडी प्रत्येकाने अंगीकारावी अशी
अ : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.
आ: आत्मा कुणाचाही दुखवू नये.
इ : इच्छाशक्ती प्रबळ असावी.
ई : इमानदारीने काम करावे.
उ: उपकार कुणाचाही घेऊ नये.
ऊ : ऊठसूट कुणाकडे धावू नये.
ए : ऐतखाऊ बनून जगू नये.
ऐ : ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.
ओ : ओझे कुणावरही होऊ नये.
औ : औकात कृतीतून सिद्ध करावी.
अं : अंदाजे तर्क – वितर्क करु नये.
अ: : अ:! वा शब्द बोलावेत.
क : कपट मनी कधी नसावे.
ख : खरं तेच आपलं म्हणावं.
ग : गर्व,अहंकार करु नये.
घ : घमेंड कशाचीही करु नये.
च : चमचेगिरी करु नये.
छ : छळ कुणाचाही करु नये.
ज : जपून जपून शब्द वापरावेत.
झ : झऱ्यासारखं निर्मळ असावं.
ट : टणक असावे पोलादासारखे.
ठ : ठकास नेहमी महाठक असावे.
ड : डर मनात बाळगू नये.
ढ : ढगांसारखंच प्रेम बरसावं.
ण : ण…ऐकणाऱ्यांस शिकवू नये.
त : तक्रार करुनी जगू नये.
थ : थंडपणा कामात असू नये.
द : दगडासारखा निर्दयी असू नये.
ध : धनांत लालच असू नये.
न : नम्रशब्दातून मन जिंकावे.
प : पटकन हो – नाही म्हणू नये.
फ : फजिती कुणाची करु नये.
ब : बडबडीपेक्षा कृती करावी.
भ : भय मनात बाळगू नये.
म : मजबुरीचा फायदा घेऊ नये.
य : यशासाठी मनी तळमळ असावी.
र : रंग सरडयासम बदलू नये.
ल : लबाड संगत करु नये.
व : वजन कृतीतून सिद्ध करावे.
श : शहाणपणाने जीवन जगावे.
ष : षडयंत्र कधी रचू नये.
स : सहनशक्ती अंगी असावी.
ह : हसून उपहास करु नये.
ळ : लबाळपणाने जगू नये.हे
क्ष : क्षमा, मन-हृदयातून करावी.