ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.189

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १८९ 

शरीर वरिवरि का दंडिसी । जंव वारिलें न करी तुझे मन । जळी नेत्र लाउनी ठोकती अविंशा लागोनी । तैसे नको ना बकध्यान करुं रया ॥ चित्त सुचित की मन सुचित्त की । न धरी तू विषयाची सोय । वनीं असोनी वनिता चिंतिसी । तरी तपचि वाउगे जाय रया ॥

त्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळीं । परि नवजाती मनींचे मळ । तुझियानि दोषं तीर्थ कुश्चित जाली । जैसी त्या रजकाची शीळ रया ॥ आंता करिसी तरी चोखटच करी । त्यासी साक्ष तुझे मन । लटिकें न झकवसी तऱ्ही । देव दुऱ्हा होसी बापरखुमादेविवरा । विठ्ठलाची आण ॥

अर्थ:-

मनातील इच्छा संपल्या नाहीत मग वरवर देहाला दंडण देऊन काय उपयोग.माश्याच्या मिशाने जसे बगळा पाण्यात ध्यानस्थ उभा दिसतो तसे तु ध्यान लावु नकोस. विषयांची सोय न पाहता स्वतःचे चित्त व मन शुध्द कर.वनात राहुन वनितेचा विचार केल्यास तुझे तसे केलेले तप वाया जाईल. तिनवेळा स्नान व अनेक तीर्थस्नाने करुन तुझ्या मनाचा मळ गेला नाही.

उलट तुझ्या स्नानाने तीर्थ ही अपवित्र होतील जसा त्या तीर्थात असलेला धोब्याचा दगड अपवित्र असतो. आता जे करशील ते चांगले कर व तुझ्या मनाला त्याचा साक्षीदार कर. जर लबाडी करशिल तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ आहे ते अशाने प्राप्त होणार नाहीत असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *