ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.६३
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६३
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥
मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
अर्थ:-
साधुचा बोध झाला की मग न संपणारा ठेवा मिळतो. पण तो ठेवा म्हणजे हरिनामच आहे. व तो अंगोपंगात मुरवुन ठेवावा लागतो व तो अनुभव मोठा असतो. कापुराची वात पेटवली की तिची समाप्ती त्या ज्योतीत होते
तसेच त्या हरिनामाची समाप्ती शरिराबरोबर व्हायला हवी. अशा साधुबोधाने नटलेला भक्त मोक्षाला पोहचतो व भाग्याचा ठरतो. साधुसंगतीची गोडी घेतली की तो जनात वनात हरिरुपाने आहे हा बोध होतो असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य
ईतर लेख, गोसावी-बैरागी-संन्यासी\, ग्रंथाचे प्रश्नोत्तरे, ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, प्रश्नोत्तर सूची, वैदिक-हिंदू संस्कृती, संत ज्ञानेश्वर चरित्र, संत ज्ञानेश्वर म. संपूर्ण चरित्र सूची, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, संत तुकाराम संपूर्ण, संत नामदेव संपूर्ण, संत समाधी अभंग, संत सोपान काका संपूर्ण, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची