ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १५७

समाधि धन्य रामनामें । आम्हां सर्व कर्मे समे । कृष्ण वाचे नित्य नेमें । जिव्हे पाठ हरिगोविंद ॥ हेची तारक पाठांतर । नित्य समाधीचें घर । शिव शंभुसी निरंतर ।

जपमाळ सर्वथा ॥ जीवाचे जीवन श्रीहरि । चिंता प्राणीयाची हरी । अंती चतुर्भुज करी । सर्व श्रीहरि माझा तो ॥ ज्ञानदेव सर्वोपरी । यंत्र साधिलें श्रीहरि । वैकुंठीचा विहारी । हदयातरी घातला ॥

अर्थ:-

जिभेने हरिगोविंद नामाचा पाठ केल्याने त्याचा नित्यनेम लाभला व त्या रामनामाने समाधी ही लाभली. तेच पाठांतर, तेच समाधीचे घर असुन ती जपमाळ सतत शिवजी जपत होते.

तो माझा हरि जीवाचे जीवन आहे तो प्राण्यांच्या चिंतेच हरण करतो व शेवटी त्याच्या सारखे चतुर्भुज करतो. त्याच हरिनामाचे यंत्र करुन ते हृदयात जपले त्यामुळे वैकुंठात विहार केला असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *