ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१२८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२८    

जन्म जरा दुःख बाधा । स्मरतां नाहीं गोविंदा । ऐसा जयासि नित्य धंदा । तोचि सदा सुखरूप ॥ धन्य कुळ धन्य याति । धन्य जन्म पुढती पुढती । भक्तीवीण नाहीं गती । मुखीं हरिनाम उच्चार ॥

विश्व विश्व जो एकु । त्यासी भक्तिवीण साधकु । नोळखे पें दुर्बुद्धी ॥ ज्ञानरजनीं रंजला । ज्ञानबोधं उपजला । ज्ञानदेवीं हरि । निरंतर सर्वकाळ ॥

अर्थ:-

गोविंदाचे स्मरण करताच जन्म, जरा व दुःख निघुन जाते. हा नामछंदाचा धंदा नित्य करणारा सदोदित सुख भोगतो. ज्याच्या मुखी हरिनाम आहे त्याचे कुळ त्याची याती येवढेच नव्हे तर पुढचा जन्म ही धन्य होतो

त्यामुळे भक्तिविन गती नाही. विश्वाचे विश्व असणाऱ्या त्या हरिला प्राप्त करण्यासाठी साधकाला नामभक्तिशिवाय उपाय नाही.मात्र हे दुर्बुध्दी असलेल्याला कसे कळेल? ज्ञान रंगी रंगलेला व ज्ञानबोधाने जो उपजलेला त्या श्रीहरिची सेवा मी निरंतर केली असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *