ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.256
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५६
लक्ष लावुनी त्रिपुटीं । ठाण त्रिभंगी चोखडें । सगुण सांवळे म्हणोनि प्रीत मना ॥ तें देखतांचि पडे मिठी दृश्यांते निवटी । मना गाठीं विरोनी ठेली ॥
जवळील निधान सांडूनि सिणसील बापा । तरी जन्मांतर न चुके बिजे रया ॥ कल्पना काळीमा वेगळी त्यागी । अहंभावाचा मोडी थारा ॥ आशा दासी करून नातळे कोठे ।
नावेक मन करी स्थिर ॥ सगुणी धरून प्रीती । मना हेचि आस्था । तरी उणीव नये संसारी रया ॥ मन हे मूर्तिमंत कीं निर्गुण भासत । पाहता नाही भेदार्थ इंद्रियांसी । आपले म्हणोनी एके वृत्ती भजतां । बापरखुमादेविवरु विठ्ठलु ध्यातां । हृदयी सुखे रया ॥
अर्थ:-
निर्गुण ब्रह्माच्या उपासनेत ध्यान, ध्याता, व ध्येय या त्रिपुटीचा त्याग करावा लागतो. परंतु आम्हाला तीन ठिकाणी वाकडे अंग जे राहिलेल्या श्रीकृष्णाचे ठिकाणी ध्याता ध्यान व ध्येय त्या
सावळ्या श्रीकृष्ण स्वरूपांच्या ठिकाणी लक्ष लाऊन राहिले असता मन अगदी तदाकार होऊन जाते. अर्थात मनातील अनंत वासना या सर्व विरुन जातात.अरे असे आपल्या डोळ्याजवळ असलेले, डोळ्यांस दिसणारे सगुण रुप हेच आहे.
ते जर न केलेस तर तुझे जन्मांतर चे दुःख नाहीस होईल. सगुण भक्ति व्यतिरिक्त मनांत इतर काही कल्पना उत्पन्न झाल्या तर कल्पना ह्या काळीमा लावतील. अहंभावाला मोडावे लागेल.
आशेला दासी करून तिच्या तडाख्यात सापडू नकोस. क्षणभर मन स्थीर करून, या सगुण श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी प्रीति असावी, असी मनात आस्था धर. म्हणजे तुला संसारात उणे पडणार नाही.
मूर्तिमंत सगुण परमात्मा आहे किंवा निर्गुण आहे. असा विचार करत असता मन व इंद्रिय ही भिन्नत्वाने उरत नाही. या करिता एकनिष्ठेने माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे हृदयांत ध्यान धरले असता सुखी होशील. असे माऊली सांगतात.