ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.216

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१६

बहुता वऱ्हाडा आलीसी बाळा । हांसती लोक परी न संडी चाळा ॥ एकाचे खाये एकांसी गाये । लाज नाही तीसी सांगावे काये ॥

वऱ्हाडीयांच्या भुलली सुखा । भोगिता पावली दुःखा ॥ नाथिले पुसे भलत्यासी रुसे । ज्यांचे लेणे लेऊनी थोर संतोषे ॥

क्षणाचा सोहळा मानिस हित । आपस्तुती परनिंदेचे गीत ॥ कवणाचे वहाड भुलली वायां । शरण रिपें रखुमादेविवरा नाह्या ॥

अर्थ:-

हे मुली, तू अनेक वेळा जन्ममरणरूपी लग्नाला विषयरूपी वऱ्हाडबरोबर घेऊन आलीस तुझ्याकडे बघून साधुसंत हंसतात. पण तू मात्र जन्ममरणाचा चाळाटाकीत नाहीस.

परमात्म्याच्या सत्तेवर तुझे जगणे आहे. पण तू कौतूक मात्र शरिराचे करीतेस. याची तुला मुळीच लाज वाटत नाही. अशा तिला काय म्हणावे.विषयातल्या सुखाला

भूलून ते सुख भोगीत असता तुला दुःखच होते.मला नित्य सुख असावे असे खोटेच विचारून परमतत्त्वालाच विसरून जातेस. परमात्म्याच्या सुखाचा अलंकार घालून तुला आनंद होतो व पहावे तर परमात्म्यालाच विसरून जाते.

क्षणिक विषयसुखात आनंद मानून स्वतःची अशी स्तुती व दुस-याची निंदा हेच गीत नेहमी गात बसतेस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विषयरूपी वहाड कोणाचे त्यांचा तुझा कांही एक संबंध नसता फुकट भुलून गेली आहेस.

म्हणजे त्या विषयात निमग्न झाली आहेस. परंतु तू विषयरूपी वहाडाचा त्याग करून रखुमादेवीवर बाप जो श्रीविठ्ठलत्याला शरण जा.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *