ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.194

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९४माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ं १९४

घरदार ओखटे त्यजू म्हणसी तरी शरीरा येवढे जाड । मायबाप वोखट त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येचे कोड । बंधु सखे त्यज्यू म्हणसी काम क्रोध मद मत्सर अवघड । बहिणी पाठीच्या त्यजू म्हणसी आशा तृष्णा मायाचे बंड रया । त्यजिलें तें काय कासया म्हणिजे सांग पा मजपाशी ऐसें ।

जया भेणे तुं जासी वनांतरा ते तंव तुजचि सरिसे रया । स्त्री वोखटी त्यजुं म्हणसी तरी कल्पने येवढी भोक्ती । पुत्र अपत्य त्यजूं म्हणसी इंद्रियांसी नाही निवृत्ति । सकळ गणगोत त्यजूं म्हणसी तरीहे अष्टधा प्रकृति । अवयेंचि त्यंचूं पाहे म्हणसी तरी मना नाही निजशांती रया ।

अवघींची तुज जवळी दुमदुमित असतां वरीवरी मुंडिसी कां करिसी विटंबना । सहज संतोषे असोनि जैसा तैसा परी तो सद् गुरु पाविजे खुणा । आपुले आश्रमी स्वधर्मी असतां सर्वत्र एकुचि जाणा । बापरखुमादेविवरू विठ्ठलु इतकिया साठीं नेईल वैकुंठभुवना ॥

अर्थ:-

घरदाराचा त्याग करुन जर वनात जायचे झाले तरी शरिराचे जड ओझे तुला वाहावे लागेल. मायबाप वाईट म्हणुन टाकु गेलास तरी अहंकार व अविद्येचे कोड तुला आहे. बहिंण भाऊ त्यागले तरी काम क्रोध मद मत्सर टाकणे अवघड आहे. पाठची बहिण सोडायची म्हंटली तर आशा तृष्णा व माया बंंड करतात. येवढा सारा पकिवार टाकलास तो काय हे मला सांग.

व ज्याला भिऊन तु वनात जात आहेस ते तर तुझ्या सतत सोबत आहेत. बायको टाकलीस तरी कल्पनारुपी बायको तुझ्या सतत जवळ आहे. पुत्र, अपत्य टाकु गेलास तर ती इंद्रिय पासुन तुला निवृत्ती नाही. सगळे गणगोत टाकलेस तरी अष्टमा प्रकृती सोबत आहेत.

व सर्वच सोडु पाहिलेस तर मनांत शांती नाही.मग येवढे सगळे बरोबर असताना वरवर दंडण मुंडण का करतोस? तु जसा आहेस तसा रहा ही सद् गुरुनी सांगितलेली खुण आहे. तु ज्या वर्णाश्रमात आहेस, जो तुझा स्वधर्म आहे त्या प्रमाणे त्यांच्याशी एकरुप होऊन रहा. तु फक्त येवढेच केसेस तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तुला वैकुंठात नेतील असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *