ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३१

प्रेम जयांचे कथेवरी । तोचि धन्य ये चराचर । रामकृष्ण निरंतरी । मुखीं आवडी जपतसे ॥ धन्य धन्य तोचि वंशी । धन्य धन्य माता कुशीं । धन्य धन्य काळ तयासी । रामकृष्ण म्हणताचि ॥

ऐसे धन्य जन्म तयांचे । धन्य धन्य पुण्य साचें । त्यासी भय कळिकाळाचै । नाहीं जन्म घेतलिया ॥ एवढा महिमा नामाचा । धन्य जो राम उच्चारी वाचा । धन्य जन्म तयाचा । ज्ञानदेव म्हणे ॥

अर्थ:-

ज्याचे हरिकथेवर प्रेम आहे जो रामकृष्णनामचा सतत उच्चार आवडीने करतो तो ह्या चराचरात धन्य आहे. रामकृष्णनामाचा उच्चार केला तर त्या वंश धन्य होतो, त्याची माता धन्य होते, त्याचा जीवनकाळ सुखमय होतो.

त्याचा जन्म धन्य होतो, त्याला पुण्यप्राप्ती होते त्याला कळीकाळाचे भय उरत नाही व परत जन्म ही घ्यावा लागत नाही. येवढा महिमा एक नामचा असुन त्याचा जन्म रामनाम उच्चाराने धन्य होतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *