मौनव्रत विधी नियम

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

मौनव्रत

हे व्रत भाद्रपद शु. प्रतिपदेला पूर्ण होते. श्रावण पौर्णिमेपासून हे चालू झालेले असते. त्या दिवशी नदीस्नान झाल्यावर कोमल दूर्वांकुरांच्या १६ गाठी घातलेला तातू करून त्याचे पूजन करतात व स्त्रिच्या डाव्य़ा हातात व पुरुषाच्या उजव्या हातात बांधलेला असतो. यानंतर महिनाभर पाणी आणणे, दळणे, नैवेद्य करणे वगैरे वेळी सर्वस्वी मौन पाळावे व भाद्रपद शु. प्रतिपदेला नदीस्नान करून नित्यकर्मे झाल्यावर देव, ऋषी, मनुष्य व पितरांचे तर्पण करावे. सदाशिवाची षोडशोपचारे पूजा करावी.

‘जन्मजन्मांतरेष्वेव भावाभावेन यत्कृतम् । क्षंतव्यं देव तत्सर्वं शंभॊ त्वां शरणं गत: ॥

अशी प्रार्थना करावी.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *