ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३०

देवावीण शून्य मुख । न घेतां नाही सुख । अंती होईल रे दुःख । नाम नसतां मुखीं ॥ राम कृष्ण गोविंद । हरि माधव परमानंद । नित्य ऐसा जयासि क्रुद । तोचि सुलभ गर्भवासी ॥

अनंत नाम निरसून । एक मार्ग तोचि मान्य । जेणें जोडे नित्य सौजन्य । तोचि रामकृष्ण उच्चारी ॥ ज्ञान देवें अनुमानलें । मग भक्तिसुख साधलें । रामकृष्ण उच्चारिले । जे तारक तिहीं लोकीं ॥

अर्थ:-

हरिनामा शिवाय असलेले मुख म्हणजे शुन्य आहे. नाम मुखात नसेल तर कसले सुख होईल. जर मुखात नाम नसेल तर खात्रीने दुःख प्राप्त होते.राम कृष्ण गोविंद हरि माधव ही नामे परमानंद स्वरुप आहेत त्या नामाचा छंद घेतला तर त्याला गर्भवासाचे दुःख होत नाही.

इतर अनंत नामे बाजुला सारुन रामकृष्णनामाचा उच्चार हाच राजमार्ग आहे व त्यामुळे नित्य सौजन्य प्राप्त होते. मी त्या रामकृष्णनामचे अनुमान केले त्याचा उच्चार केला ते तिन्ही लोकांत तारक नाम मी घेतले त्यामुळे भक्तीसुख साधले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *