ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.303

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०३

जिता जिणे लागे गोड परत्री ते अवघड । अवघीयाहनि तनु वाड मरण भलें ॥१॥
जिता मरिजे मरोनियां उरिजे । इतुले जाणिजे तरी जपणेचि नलगे ॥२॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाच्या पायीं ॥ ज्ञानदेव पाहीं मरण सांगे ॥३॥

अर्थ:-

जिवंत असतांना परमार्थ न करती स्वैराचार केला परंतु ते परलोकी मात्र ते वाईट आहे.या देहात येऊन मरण साध्य करुन पुन्हा जन्माला येण्याचे बंद केले पाहिजे.येरव्हीं मनुष्ये मरतात. ते त्याचे मरण नसून या देहातुन ते दुसऱ्या देहांत जातांत.ज्याला आत्मज्ञान होते त्याचे अज्ञान निवृत्त झाल्यामुळे पुन्हा जन्माला येण्याचे कारण राहात नाही.

अशा तऱ्हेचे मरण जिंवतपणीच साधले पाहिजे. हे मरण साधून आपण ब्रह्मरुप आहोत असे जाणून राहिले पाहिजे. ज्ञानवानाचा देह प्रारब्धाप्रमाणे असतो. म्हणुन तो जपण्याचे कारण नाही. वरील प्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल यांच्या चरणावर मरण साधावे.असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *