ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.217

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१७

आउट हात आपुले आपण होतासी । येर तें साडितासी कवणावरी । ऐसेनी सांडिसी तरी थोडे ते सांडी । कां सकलैक मांडी तेणें सुखिया होसी रया ॥

कळिकाळ ते आपण प्रभा अनु कोण । करिता दीपे लाजिजे घरामाजी घरकुल करू पाहासी । ते दैन्यचि वाउगे येर सकळैक तू आहासी रया ॥

पृथ्वी येवढा घडुला घेयावा । मा गगना भरू जावें अनाठायां ॥ अस्ती नास्ती दोन्ही येकेची पदी । आकाशाची भरोवरी घटे केवी कीजे रया ॥

धावत धावत वेगे तुजचि तू आड रिगें । पाय खोवितु खोंवितु मार्ग ठाके काई । जासलट जा वाही त्याची सवा पाही । वायां तूं हांवे जासी रया ॥

जागणे न काय जन्मलासी? । निजलेनि काय निमालासी ? । स्वप्ने काय केलासी तडातोडी ? ॥ ऐसा जाणत नेणत जेथीचा तेथे ।

आभासत असे तंची तू भूल तेथे रया ॥ आपला आरोहणी । लावू पहातोसी निशाणी । तरी सांगेन ते वाणी । लाविजेसु ॥ श्रीगुरू निवृत्तिनाथा चरणकमळीं ।

अर्थ:-

पाखेवीण होय आळिय म्हणे ज्ञानदेव ॥ आपल्या हाताने आपले शरीर मोजले तर ते साडेतीन हात भरते. व शरीरावरच अभिमान ठेवला तर सर्व जगतावर अभिमान ठेवीत नाहीस.

हे साडेतीन हात असलेले शरीर टाकून दे म्हणजे मी शरीराहून वेगळा आहे.असा निश्चय कर.म्हणजे नित्य आनंदरूप जो परमात्मा तद्रुप तू होशील. कालादिक सर्व अनात्म पदार्थाचा प्रकाशक परमात्माच आहे

व तो परमात्मा हेच माझे स्वरूप आहे. म्हणजे सर्वाचा प्रकाशक मीच आहे. असा निश्चय कर त्या आपल्या स्वरूपांला विसरून जाऊन परिछित्र देहादिकांचे ठिकाणी आत्मत्व निश्चय करणे,

म्हणजे आपल्या घरांत आणिक एक घर करून दुःख भोगण्यासारखे आहे. तुझ्या स्वरूपाहून बाकीचे सर्व भासमान असणारे जगत तुझ्या स्वरूपांच्या ठिकाणी अध्यस्त आहे.

म्हणून ते तू आहेस कारण ज्याच्यावर जे कल्पित असते ते तद्रुप असते. पृथ्वी येवढे घर केले तरी त्यात भरण्याला आकाश आणावयास दुसरीकडे जावे लागते काय? ते त्या घरात आपोआपच येते.

राना वनात चालणाऱ्याला तेथे राजरस्ता कसा मिळेल. व विहित रस्ता सोडुन दुसऱ्या रस्त्याची हाव धरलीस तर संकट येईल. व जेथे जायचे तेथे पोहचणार नाहीस.

तु जगात आलास म्हणजे तु जन्मलास किंवा देह संपला म्हणजे तुला मरण आले का? स्वप्नातील देह व जागृतीतील देह यांची कशी ताटातुट होईल. आत्मा व्यापक स्वरुपात आहे

त्याला जन्ममरण नाही हे तुला समजत नाही. हे तुला समजायचे असेल तर बिन पंखाच्या आळी प्रमाणे तु श्री गुरु निवृत्ति चरणी स्थिर हो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *