अन्नाचा,भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नमस्ते, सुप्रभात।

अन्न विषयी चांगली माहिती आपल्यापुढे
स्नेहपूर्वक मांडत आहे।

अन्नाचा भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

यावर आपण एक उदाहरण बघू:–
*” तीन महीन्याचा एक प्रयोग करुन बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे मन होते.सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी भोजन नाही तर ते ईश्वराच्या स्मरणात बनवलेले भोजन असते.
★जर रागात आपण स्वयंपाक केला असेल तर त्यास सात्विक अन्न म्हणत नाहीत.


म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही,रागात,उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. ( अन्न शिजवू नये )
★तसेच कधीही स्वयंपाक करताना आईला ,बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना) ओरडू ,रागवू नये,त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाक घरात मध्ये जाऊन स्वयंपाक करताना त्या पदार्थात त्याच प्रकारची ( सर्व रागाची ) स्पंदने येतात,आणि तेच आपण खाणार असतो. हे लक्षात ठेवण्याची महत्त्व पूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी *सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पध्दत होती*

★#भोजन तीन प्रकारचे असते
१)जे आपण हाटेल मध्ये खातो.
२)जे घरात आई ,पत्नी बनवते, आणि
३)जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो ते भोजन
असे तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात.

*(१) जे हाटलात पदार्थ बनवतात ते विकत घेऊन खावे लागते, आपण नेहमी खाल्ल्यास ती स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाही,त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रास होतो, ते पदार्थ कोण शिजवतं , त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे , त्याचा भाव कोणता आहे हे सगळं अन्नात उतरत, तेच संस्कार त्या अन्नावर होतात
तोच भाव आपल्यात उतरतो.🙏

*(२) घरात आई,पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने करत असते.म्हणून त्या पदार्थात सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात.

हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात,त्याच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.

घरात जर मुलगा जेवत असेल आणि आपल्या म्हणत असेल की मला अजून एक पोळी वाढ तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलुन येतो,ती अजून प्रेमाने एक पोळी त्यास वाढते ,त्यात तिच प्रेम असतं आनंद असतो .पण हेच आपण स्वयंपाकी कडे मागितले तर तो वाढेल पण त्यात प्रेम असेलच असे नाही ,असे खाणे अंगी लागत नाही.

(३) जो मंदिरात अन्नकोटात खातो तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो ती भावना प्रसादाची असते.ते अन्न ईश्वराला स्मरण करुन शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.

आपण ही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल.यासाठी आपले स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा,मन शांत ठेवा,देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसाद भक्षण होईल.
स्वयंपाक करताना अनेक उपाय ही करता येतात,घरात काही त्रास असेल तर त्यावर हा एक उपाय आहे ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.


परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणा-यांच्या मनात एकमेकां विषयी प्रेम , वात्सल्य ,आपुलकी , विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊ दे, सकारात्मकता तुझ्या विषयी श्रध्दा निर्माण होऊ अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा..
अन्नात जादू आहे , आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचा ही परिणाम होतो करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्या विलक्षण परिणाम होतो.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी असो कुकर असो काही असो त्या पात्राला हात लावून कृष्णार्पण म्हणून 🙏करा मग बघा काय जादू होते.
सगळी आजुबाजुची सुक्ष्म स्पंदन संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *