ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १५५

ॐ नमो भगवते वासुदेवाया । वोडियाण बंदु देहुडा । घालुनि लागसील पावो । ओतप्रोत सांडूनि मना धरिसी

अहंभावो । ॐकार बिंदुचा न पवसी ठावो । वोळगे वोळगे वोळगे कृष्णद्वारावतीये रावो ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाया । द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काह्या ॥ नागिणी उत्साहं नवहि द्वारें

निरोधून । नाडित्रयामाजीं सुषुम्ना संचरण । न साधे हा मार्ग ऐसें बोलती मुनिजन । नरहरि चिंतने अहर्निशीं मुक्तिस्थान ॥ मोडिसी करचरण तेणें पावसी अंत समो

मोहो तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवीं गमो । मोठा हा अन्यावो जे हरिचरणीं नाहीं नमो । मोक्षाची चाड तरी मुकुंदीं मन रमो ॥ भांबावसी झणे हें शरीर कर्दळी स्तंभ ।

भस्म कृमि विष्ठा उभे आहे तो सुशोभ । भाविता कीटकी जाली मुंगी तिया क्रमिलें नभ । भावें भक्ति सुलभ वोळगा वोळगा पद्मनाभ । गति मती इंद्रियें जव आहे ती

समयोग । गणिता अयुष्य न पुरे जंव हें न वचे भंग । गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग । गरूडध्वज प्रसादें निस्तरिजें भवतरंग ॥ वनीं सिंह वसतां गजीं मदु केवीं धरावा । वन्हिदग्ध बीज त्यासी

अंकुर केवीं फुटावा । वज्रपाणी कोपलिया गिरीं उदधि केवीं लंघवा । वदनीं हरि उच्चारा तेणें संसार केवीं भुंजावा ॥ तेज नयनींचा भानु जेणें तेजें मीनले ते । त्याचे मानसींचा चंद्रमा तो

सिपोते अमृतें । त्याचे नाभिकमळीं ब्रह्मा तेणें सृजिलीं सकळही भूतें । तें विराटस्वरूप ओळखावें विष्णुभक्तें ॥ वाताघातें फुटे गगनीं मेघाचा मेळावा ।

वारिबिंदु पद्मिणिपत्र केवीं हो ठेवावा । वानराच्या हातीं चिंतामणी केवीं द्यावा । वासुदेव चिंतने तोचि कल्मषा उठावा । सूक्ष्म स्थूल भूतें चाळिता हे परम हंसू ।

शूळपाणी देवोदेवी जयाचा रे अंशु । शुभाशुभीं कर्मी न करी नामाचा आळसु । सुखें निरंतरी ध्याई ध्याई हृषिकेशु ॥ देव होऊनि उदार भक्तां देतो अमरपदें ।

देता न म्हणे सानाथोर वैरियासी तेंचि दे । देहे सार्थक अंती वासुदेव आद्यछंदे । देखा अजामेळ उद्धरिला नामें येणें मुकुंदे ॥ वाया सायासी मनुष्य जन्म

पावावा । वियाला पुरूषार्थ तो कां वायां दवडावा । वाचामनें करूनी मुरारी वोळगावा । व्रत्रें एकादशी करूनि परलोक ठाकावा ॥

या धनाचा न धरी विश्वास जैशी तरूवर छाया । यातायाती न चुके तरी हे भोगिसील काह्यां । या हरिभजनेंवीण तुझे जन्म जाते वायां ।

या लागीं वैकुंठनाथाच्या तूं चिंती पा रे पायां ॥ इहींच द्वादशाक्षरीं ध्रुव अढळ पद पावला । प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासूनी जळां । बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुम्ही घ्या रे वेळोवेळां । तो कळीकाळापासूनी सोडविल अवलीला ॥

अर्थ:-

ॐनमो भगवते वासुदेवाय नमस्कारुन त्याच्या प्राप्तीसाठी गुद् व शिश्न यांच्यामध्ये असलेल्या ओडीयान बंधाला पाय लावून असे श्रम करुन आत ओतप्रत भरलेल्या त्याला सोडून मनात अहंमभाव सोडून ओमकार बिंदूचा ठाव न कळता त्या कृष्ण नावाला शरण जा.ओम भगवते वासुदेवाय हा व्दाक्षरी मंत्र तू का जपत नाहीस. नवव्दारांचा निरोध करुन नाडीव्दारे सुश्सुम्नेत संचरणारी कुंडलीनी हा मार्ग सोपा नाही

असे मुनी मानतात मात्र नरहरी नामाच्या सतत चिंतनाने मुक्तीस्थान मिळेल अंत समयी योगामुळे हात पाय मोडून घेणे हिताचे नाही. मोह व तृष्णा न तुटल्याने ब्रह्मविद्या कशी येईल हरी चरणाशी नम्र होत नाही हा मोठा अन्याय आहे. मोक्ष हवा असेल तर मुकुंद चरणी मन रमव कर्दळी प्रमाणे दिसणारे गोमटे शरीर पाहून भांबावू नकोस ते कृमी व विष्ठेने भरलेले आहे.

उभे आहे तोपर्यत शोभा देते. जाळले तप भस्म होईल व तसेच ठेवले तर कोल्हे कुत्रे खातील त्यामुळे भक्तीने त्या पद् नाभाला ओळख जोपर्यत बुध्दी व इंद्रिय चांगली आहेत तो पर्यंत त्याला शरण जावून त्या योगाने हा भवसागर तरुन जा वनात सिंह असताना हत्तीने माज का करावा भाजलेल्या बीजापोटी अंकुर कसा फुटावा इंद्र कोपला तर पर्वताने समुद्र कसा ओलांडावा.

तसेच तोंडाने हरी उच्चारण करणाऱ्याला संसार कसा बाधावा?त्याच्याच डोळ्यातील तेजामुळे सूर्य तेजस्वी होतो त्याच्या मनातील चंद्रमा अमृत वर्षाव करतो. त्याच्या नाभीत जन्मलेल्या ब्रह्माने ही सृष्टी निर्मिलेली आहे हे विष्णूभक्ता त्याचे विराट स्वरुप तू ओळख.

वादळामुळे आकाशातील ढग विस्कळीत होतात कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब कसा राहील. माकडाच्या हाती चिंतामणी कसा दयावा?वासुदेव चिंतनामुळे जीवाच्या ठिकाणी दोष कसे राहतील?सर्वस्थूल व सूक्ष्म जीवाचे चालक महादेव आहेत ते व इतर देवता त्याचेच अंश आहेत. चांगली वाईट कर्मे करताना नामाचा आळस का करतोस.निरंतर सुख हवे असेल तर त्या ऋषीकेशाला स्मर.

तो उदार झाला की लहान थोरपणा न पाहता भक्तासकट वैऱ्यालाही अमरपद देतो.वासुदेव नाम छंदाने देह सार्थक होतो. पहा तो पापी अजामेळा कृष्ण नामाने उध्दार पावला.मोठ्या सायासाने मिळालेल्या मनु्ष्य जन्मातील पुरुषार्थ का वाया घालवतोस.वाचा व मनाने त्या मुरारीला ओळख एकादशी व्रत करुन परलोक प्राप्त करून

घे.झाडाच्या छायेप्रमाणे असलेल्या धनसंपत्तीवर विश्वास ठेऊ नकोस ते तुझ्या जन्म मृत्युची यातायाती चुकवणार नाहीत. हरीजन्मावीण तुझा जन्म वाया जात आहे त्यामुळे त्या वैकुंठ नाथाच्या पायाचे चिंतन कर. याच बारा अक्षरी मंत्राने ध्रुव अढळ पदाला गेला.

अग्नी जळ व शस्त्रा पासुन प्रल्हाद रक्षिला ते माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठठल नाम वेळोवेळी घ्या तेच तुम्हाला कळीकाळापासून अलगद सोडवेल असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *