ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १५४

विठ्ठलु नाहीं जये शरीरी । वाया कां गा जन्मले संसारी । विठ्ठलु नाहीं जये नगरीं । तें अरण्य जाणावें ॥ विठ्ठलु नाहीं जये देशीं । स्मशान भूमि ते परियेसी । रवि शशिवीण दिशा जैसी । रसना तैसी विठ्ठलेवीण ॥

विठ्ठलावेगळें जितुकें कर्म । विठ्ठला वेगळा जितुका धर्म । विठ्ठला वेगळे बोलती ब्रह्म । तितुकाही श्रम जाणावा ॥ सच्चिदानंद घन । पंढरिये परिपूर्ण । कर डेवोनियां जघन । वाट पाहे भक्तांची । विठ्ठलेवीण देवो

म्हणती । ते संसार पुढती पावती । विठ्ठलावीण तृप्ती । नाही प्रीती विठ्ठलेंवीण ॥ श्री गुरु निवृत्तीने दिधलें । ते प्रेम कोणे भाग्ये लाधलें । बापरखुमादेवीवर विठ्ठलें । ऐसें केलें ज्ञानदेवा ॥

अर्थ:-

ज्या शरिरी विठ्ठल नाही ते उगाच जन्मले व ज्या नगरात विठ्ठल नाही ते अरण्य समजावे. विठ्ठल नसलेला देश स्मशान आहे तर ज्या जिभेवर विठ्ठल नाही ते चंद्र सुर्याशिवाय दिशा असण्यासारखे आहे.विठ्ठला वेगळे कर्म, धर्म व ब्रह्म म्हणजे वाउगा श्रमच आहे

. ते परिपुर्ण सच्चितानंद धन कमरेवर हात ठेऊन भक्तांचे वाट पाहात आहे. जे विठ्ठल सोडुन इतर दैवते मानतात ते परत संसाराला येतात त्या विठ्ठलावीण प्रिती व तृप्ती ही नाही. हे प्रेम निवृत्तिनाथांकडुन मिळाले व माझे पिता व रखुमाईचे पती असलेल्या विठ्ठलामुळे मला प्राप्त झाले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *