ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३६
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३६
नाम पवित्र आणि परिकरु । कल्पतरुहुनि उदारु । तें तु धरी कां रे सधरु । तेणें तरसी भव दुस्तरु ॥ नरहरिनाम उच्चरी । तेणें तरसी भवसागरीं ॥ जपें न लाहसी तपें न लाहसी । क्रियें षट्कर्मे न पवसी । नामें
एके रे पावसी । स्वर्गी अमृतपान ॥ क्षीर गोड म्हणसी ऐसें । परी तेथेही वीट असे । नाम उच्चारितां वाचे । कोटि जन्मांचे पातक नासे ॥ मन मारुनियां सायासें । परी तेथेही अवगुण असे । नाम उच्चारितां वाचे ।
सकळिक ध्यान डोळांदिसे ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे । विपायें नाम आलें वाचे । जळती डोंगर कल्मषाचे । भय नाहीं कळिकाळाचे ॥
अर्थ:-
पवित्र व परिकर नाम हे कल्पतरु पेक्षा उदार असुन तु त्याला धैर्याने धारण केलेस तर दुस्तर भवसागरातुन तरशील. नरहरिनामाच्या उच्चारणाने भवसागरातुन सहज बाहेर पडशील. त्या भगवंतला प्राप्त करण्यासाठी जप तप करावे लागणार नाही षटकर्म करावी लागणार नाहीत फक्त नाम
उच्चाराने स्वर्गात अमृतपान करशील. दुध गोड म्हणावे तरी त्याचा वीट येतो. पण नामाचा वीट येत नाही व त्यामुळे कोटी जन्माच्या पापाचा नाश होतो. सायासाने मन मारुन राहिले तरी त्यात अवगुण आहे. नामाच्या उच्चाराने तु स्वरुपाला प्राप्त होशील.
चुकुन जरी माझे पिता व रखुमादेवीचेे पती श्री विठ्ठलनाम मुखाशी आले तरी पापकर्माचे डोंगर जळतात व कळिकाळाचे भय राहात नाही असे माऊली म्हणतात.