ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.293

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९३

औट हात चर्म देह बांधवडी । त्रिगुणाची घडी नुगवे रया ॥१॥
सोकरितां घाया काय करील माया । श्रीगुरूच्या पाया विरूळा जाणे ॥२॥
सोहंकरा सोहंकरा हरि पोकारा । वायांच मायेचा वारा भरू नका ॥३॥
सप्तद्वीप पृथ्वी नवखंडे देव । स्वर्गभोगभाव राणीव व्यर्थ ॥४॥
ज्ञानदेवी सार हरिपंथ पार । एकतत्त्व उच्चार तिहीं लोकीं ॥५॥

अर्थ:-

सत्व, रज तमात्मक जो साडेतीन हाताचा, चामड्याचा देह म्हणजे स्थूल देह त्याच्या तडाख्यात सापडलेल्या जीवास त्यातून बाहेर निघणे होत नाही. पुष्कळ खटपट केल्यातरी ती माया तुला कशी बाहेर जाऊ देईल बाहेर पडण्याचे मुख्य वर्म श्रीगुरूचरणसेवा हे आहे. पण हे वर्म जाणणारा क्वचित असतो.‘सोहं’ म्हणजे तो परमात्मा मी आहे. असा हरिनामाचा

गजर करा. निष्कारण माया मोहात पडू नका. सप्तद्वीप, नवखंड पृथ्वी इंद्रादिक देव व त्यांचे स्वर्गादिकातले ऐश्वर्य हे सर्व भोग फुकट आहेत. या असार संसारांत ऐक्यभावाने हरिभजनाचा पंथ हे त्रैलोक्यांत मुख्य साधन असून त्या परमात्म्याच्या भजनानेच संसारातून पार पडणे शक्य आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *