ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.237

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३७ २३७

नाद भेद सिद्ध अवघेचि विरुध्द । जेणे तुटे भेद तेंची जपे ॥ सुताचिये गुंजे सुतचि पैं माजे । हरिचरणाबूंजे निवडतां ॥२॥

रुक्मीणीचा नाहो हाचि पै उगवो । प्रपंच ते वावो जावो परता ॥३॥ ज्ञानदेवा चित्त हरि गोत वित्त । विज्ञान उचित ज्ञानघनें ॥४॥

अर्थ:-

भगवत्प्राप्तीला योग शास्त्रांत नाद, भेद, सिद्धी, वगैरे साधने सांगितली असली तरी ती भोळ्या भाविकांना अनुकुल नसून उलट प्रतिकूल आहेत.बाबानो ज्या श्रीहरिच्या नामाने संसार बंध तुटतो त्या श्रीहरिच्या नावाचा जप करा.

सुताच्या गुंडीत आत बाहेर सुताशिवाय दुसरे कांही नसते. त्याप्रमाणे संसाराचा विचार केला असतां सर्वातील सार श्रीहरिचे चरण कमलच आहे.असा श्री हरि लक्ष्मीचा पति हेच ज्याने आपल्या मनाचे स्थान केले आहे. तो मनात असे म्हणतो की,

हा असार प्रपंच नष्ट होत असला तर होवो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माझ्या चित्ताचे गणगोत ज्ञानघन जो श्रीहरि तोच असणे उचित आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *