1 भगवान श्रीकृष्ण चरित्र
!!! श्रीकृष्ण !!! भाग – १.
कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती. यमुनाकाठचा सर्व प्रदेश अत्यंत सुपिक,सधन असलेमुळे कुरु, मत्स्य, पांचाल, शूरसेन, चेदी आणि मगघ अश्या क्षत्रियांची राज्ये वसलेली होती. या सर्वांमधे मथुरा राज्याचा इतिहास उज्वल व प्राचीन होता. फार पुर्वी मथुरेचा हा भाग अगदी घनदाट अरण्याने वेढलेला असुन तिथे मधु राक्षसाचे राज्य होते. तो राक्षस असुनही वृत्तीने देवसमान होता. त्याच्या या राज्याला मधुपुरी किंवा मधुवन म्हणुन ओळखले जात असे. या अरण्यांत अनेक ऋषी मुनी निर्वेधपणे तपश्चर्या यज्ञयागादी कार्ये करीत असे प्रजाही सुखी आनंदी समाधानी होती.
मधुच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र लवण, जो अत्यंत दुष्ट, जुलमी व असुरी वृत्तीने वागणारा असुन ऋषीमुनींच्या तपश्चर्येत यज्ञयाग कार्यात विध्वंश करु लागल्या मुळे त्रस्त झालेले प्रमुख ऋषींमुनी अयोध्येच्या प्रभु रामचंद्रांकडे गार्हाणे नेल्यावर त्यांना अभय देऊन आपला भ्राता शत्रृघ्नला ससैन्य ‘लवणचे’ पारिपत्य करण्यास पाठविले. लवणचा पराभव करुन त्यास ठार मारुन मधुवनाचा सगळा भाग निर्भय केला आणि प्रभु रामचंद्रांच्या आज्ञेनुसार शत्रृघ्ननने तिथे आपले राज्य स्थापण केले. तेथील घनदाट जंगल तोडुन सुंदर वसाहत निर्माण करुन त्या वसाहतीला ‘शूरसेन’ नांव देऊन मथुरा राजधानी निर्माण केली. या नगरीभोवती उंच तटबंदी, मोठमोठ्या नगरवेशी उभारुन दुसरी अयोध्यानगरीच जणुं मथुरा निर्माण केली.
पुढे वंशपरंपरा लयाला जाऊन यादव, अंधक, भोज, इत्यादी सोमवंशीय क्षत्रियांची वस्ती झाली. भोजकुलातील शूरसेन क्षत्रियाने तेथे आपले राज्य स्थापण केले. त्याच्या कारकीर्दीत मथुरा नगरी पुन्हा भरभराटीस आली. शूरसेन अत्यंत कर्तुत्ववान, राजकारण कुशल, राजधर्म जाणणारा व प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा होता. त्यावेळी भौम, कुकर, अंधक, दार्शाह, यादव, वृष्णी आणि भोज ह्या सात जाती आपापला व्यवसाय करीत वसाहती करुन आनंदाने राहत होते. या सात जातींमधे यादव प्रमुख असुन यादववंशाची वंशवेल थेट ययातीपुत्र यदुपर्यंत पोहोचली होती.
प्रस्तुत कथानकातील ‘वसुदेव’ यादवांचा मुख्य सरदार म्हणुन भोजराजाचा मांडलिक, यमुनानदी पलीकडे गोवर्धन टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या अत्यंत सुपीक, वनराजींनी नटलेल्या, विपुल चराऊ कुरण असलेल्या जहागिरीच्या गावी राहत होता. शिवाय मथुरेतही त्याचा वाडा होता. भोजराजाचा तो प्रमुख सल्लागार असुन राजा ऊग्रसेनचा खास मित्र होता. यादवांना राज्याचा अधिकार नाही ही पुर्वापार समजुत असल्यामुळे यादववंशीय क्षत्रिय बहुधा गोपांचा धंदा करीत असत. तिथल्या वातावरणामुळे वैश्यही वाणिज्य व्यवसाय न करतां गवळ्याचाच धंदा करीत असत. या सर्व यादवांचा प्रमुख वासुदेव भोजराजाचा पहिल्या प्रतिचा सरदार असुन त्याचेवर विशेष मर्जी होती. उग्रसेनच्या कारकिर्दीत मथुरा भरभराटीस असुन प्रजा सुखी होती.
उग्रसेनचा पुत्र कंस युवराज झाला. तो शूर, पराक्रमी तेवढाच क्रुर, कठोर आणि सत्तालोभी असल्यामुळे मथुराच नव्हे तर, आसपासचे सारे राजे सुध्दा त्याला वचकुन होते. बाजुच्या सात राज्यातील “मगध” राष्र्ट सर्वात बलाढ्य असुन जरासंध सम्राटाचा सगळीकडे चांगलाच दबदबा होता पण मथुरेचे भरभराटीस आलेले राज्य त्याच्या डोळ्यात खुपत होते. त्याने राजकारण लढवुन अस्ति व प्राप्ती या आपल्या दोन कन्या युवराज कंसाला देऊन भोज घराण्याशी निकट संबध जोडले. जरासंधाचा पाठींबा मिळताच कंस उन्मत्त होऊन, बंडाळी माजवुन, मंत्र्यांना वश करुन बाप उग्रसेनला बंदीवासात टाकुन स्वतः राज्य करुं लागला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६