ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.310
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१०
तूं तो माझे मी तो तुझें । ऐक्य जालें तेथे कैचें दुजें ॥१॥
तूं हो मी गा मी तो तूं गा । अज्ञानें बापुडीं नेणती पैं गा ॥२॥
सगुण होतें तें गुणासी झालें । सगुण निर्गुण एकचि जालें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे परतूनि पाही ।जीवाचा जिवनु कवणीये ठायीं ॥४॥
अर्थ:-
हे श्रीकृष्णा तु माझा व मी तुझा ज़ालो या दृष्टिने तुझ्या माझ्या स्वरुपांत ऐक्य झाले तर आता तेथे द्वैत कोठून राहणार. तू तोच मी आणि मी तो तू असा उभयतांचे स्वरुपांत ओतप्रोत भाव आहे. पण जीवांना अज्ञानामुळे भेद वाटतो.
निर्गुण स्वरुप परमात्माच मायायोगाने भक्तावर अनुग्रह करण्याकरिता सगुणरुप धारण करतो. आणि अज्ञान नाहीसे झाले की निर्गुण व सगुण एकच आहे असे कळते. जीवाचे जीवन जो परमात्मा तो कोणाच्या ठिकाणी आहे हे सहज कळेल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.