ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.214

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१४ 

मृगजळाचे डोहीं मारिशील जळचरें । कैचे जळ तेथे कैसा मत्स्यरे ॥ लटकीच खटपट लटकीत खटपट । लटकीच खटपट रे साळोबा ॥

वांझेचिया पुता घालशील मारे । तेथे कैचा पुत्र मृत्यु कोणा संहारे ॥ रोहीणीचे वारु आणिसी सावया । कैचे वारू काय जंझशील वायां ॥

स्वप्नीचिया धना बांधिसी कळांतरा । कैचे धन काय होशी व्यवहारा ॥ निवृत्तिप्रसादे ज्ञानदेव म्हणे । स्वप्नीचे तें सुख ते साळ्या जाणे ॥

अर्थ:-

बावळटपणाने मृगजळाचे डोहांत मांसे मारू लागला तर तेथे पाणीच नाही मग मांसे कोठले. ही सगळी खटपट फुकट आहे.वांझेला मुलगाच नाही त्याला कोण मारणार.मृगजलाचे घोडेच नाहीत तर त्या घोड्यावर बसून कोणाबरोबर युद्ध करणार.

स्वप्नांतले धन ते धनच नाही. तर त्या धनांवर व्यवसाय काय करणार. स्वप्नातले सुख ते सुखच आहे असे बावळट मनुष्य समजतो असे निवृत्तिरायाच्या कृपेने माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *