ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.212
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१२
विष्णुवीण मार्ग घेशील अव्यंग । तरी वायांची सोंग करणी तुझी ॥ येऊनि संसारा वायाचि उजिगरा । कैसेनि ईश्वरा पावसी हरि ॥
नरदेह कैचे तुज होय साचें । नव्हे रे देहींचे सुख तुज ॥ ज्ञानदेव म्हणे शरण रिघणें । वैकुंठीचे ऐणे अंती तुज ॥
अर्थ:-
एका श्रीहरिला सोडून इतर मार्ग कांही व्यंग न देता आचरलेस तरी तो तुझा खटाटोप फुकट सोंग होईल. जन्माला येऊन असे फुकट परिश्रम केलेस तर श्रीहरिला कसा प्राप्त होशिल.
हा मनुष्य जन्म कायम टिकणारा आहे काय ? तसेच देहात होणारे विषयाचे सुख कसे हित करेल? म्हणून श्रीहरिला अनन्य भक्तीभावाने शरण जाऊन वैकुंठपद प्राप्त करून घे. असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य
ईतर लेख, गोसावी-बैरागी-संन्यासी\, ग्रंथाचे प्रश्नोत्तरे, ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, प्रश्नोत्तर सूची, वैदिक-हिंदू संस्कृती, संत ज्ञानेश्वर चरित्र, संत ज्ञानेश्वर म. संपूर्ण चरित्र सूची, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, संत तुकाराम संपूर्ण, संत नामदेव संपूर्ण, संत समाधी अभंग, संत सोपान काका संपूर्ण, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची