ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.207

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०७

बुद्धिमात चित्त धन वित्त गोत । निजानंदे तृप्त करी रया ॥ नैश्वर्य ओझे ऐसे तूं बुझे । वायां मी माझे म्हणसीं झणी ॥

सांडी संडी मात उभया दुरित । हरिवीण हित घेवो नको ॥ ज्ञानदेवा गीत जालें असे सांग । वेगी श्रीरंग पावेल तुज ॥

अर्थ:-

उत्तम बुद्धी, एकाग्र चित्त, भरपूर ऐश्वर्य, पुत्र पत्नीदि सर्व कांही अनुकूल असले तरी त्यांच्या मोहात न गुंतता निजानंद तृप्ती मिळव हे सर्व अनात्म ऐश्वर्य क्षणांत नष्ट होणारे आहे

असे तू समज ह्याना वायाच आपले मानु नकोस.संसार अनुकूल असणे किंवा प्रतिकूल असणे ही दोन्ही पातके आहेत असे समज. एका परमात्मप्राप्ती शिवाय दुसरे कशांत आपले कल्याण आहे असे समजू नकोस. भगवंताचे गुण गायीले तर श्रीरंगाची प्राप्त निश्चित होईल असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *