ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.205

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०५

तें सत्त्वरजतमें धुतलिया आशा । वेगी त्या निराशा फळेविण ॥ तैसें हें टवाळ हरिवीण पाल्हाळ । कैसेनी मायाजाळ निरसे रया ॥

त्रिपुटीचे पेठे वानवसा दिठा । वैकुंठ चौहटा पिकला रया ॥ बापरखुमादेविव विठ्ठलु साजिरा । मार्गी मार्ग एकसरा नामे तारी ॥

अर्थ:-

सत्व, रज, तम व आशा यांचा मळ धुतल्याशिवाय परमात्मरूपी फळाचा आशा करणे फुकट आहे.तसेच ह्रीची प्राप्ती झाल्याशिवाय बाकीची इतर साधने करणे फुकट पाल्हाळ आहे.

हरिचितनाशिवाय मायेचा निरास कसा होईल. सत्व, रज, तमाच्या पेठेत पंढरीत तो प्रगटला आहे.होऊन सर्वांना सोपा झाला आहे.रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल हे सुंदर असून त्यांच्या नाममार्गाचा एकटा मार्ग तारक आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *