ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.175
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७५
नागोठणी गोपाळ । वळतिया देतों । की आनंदली गोधने । ऐकोनी वेणुध्वनी तत्त्वतां । तुझी सावळी सुंदर बुंथी । न विसंबू क्षणभरी । तेवीं सुख सुख पाहातां । निजचित्ता रया ॥१॥
आनंदल्या मनें । पहा तुं निधान । जवळिल्या निजधन । सांडु नको ॥धृ॥ म्हणोनि कल्पनेचा । उभारा मन संधीचा । संधु भागु अनुसराया । गोठणीचया ।
दुर्लभ शक्ति ते । गोपवेषे नटले चैतन्य । मादुसेंचे परांदिका । नव्हे निजशक्ति रया ॥२॥ म्हणोनी रखुमादेविवरु । सदसुखाची निजवोल । पाहे मीतूंपणा नातळे । तो ऐसियाचि बुंथि सखोल । निवृत्तीरायै खुणा । दाऊनि सकळ । निज चैतन्य पाहे निखळ रया । । ३ । ।
अर्थ:-
यमुनेच्या तीरी बसल्या बसल्या इतर गोपाळांना गाई वळायला सांगतो.तुझी सावळी सुंदर मूर्ती व तू काढलेला मधुर ध्वनी यामुळे माझे चित्त सुखरुप झाले असून ते क्षणभर दुसरीकडे जात नाही. हे आनंद झालेल्या मना त्या सुखनिधानाला तू पाहा व हे निजात्म धन कधीच सोडू नकोस. कल्पनारुपी मन व परमात्म स्वरुप यांची एक होण्याची संधी साधून घे.
त्या परमात्म्याची शक्ती दुर्लभ आहे ते चैतन्य गोपवेष धारण करुन आले आहे त्याचे वर्णन चारही वाणींना त्याचे वर्णन करता येत नाही अशी त्याची शक्ती आहे. असा हा निजसुखाची वेल असलेला मी तू पण नसलेला असा त्या रखुमाईचा पती,असा त्याची खूण निवृत्ती रायांनी सर्वांना दाखवली ते निज चैतन्य तुम्ही सर्वांनी पहा असे माऊली सांगतात.