ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.171

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७१

पावया लुब्ध झाल्या पावळा । गाई परे वळा रे कान्हा ॥ विसरल्या चार विसरल्या पार । तल्लीन साचार कृष्णमूर्ती ॥ पाणिया निघाल्या गाई चरती कळंबा ठायीं ।

हांकितसे लवलाही संवगडा ॥ ज्ञानदेवी गाई हाकितु पावे सोई । हरिनाम दोही सत्राविये ॥

अर्थ:-

कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या गाई मुग्ध झाल्या. त्यांना परत चाऱ्याकडे वळा. त्या गाई कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या नंतर कळंब वृक्षाच्या खाली असणाऱ्या गाईंना सवंगडी हाकारत होते.

हरिनामाच्या गाई हाकल्याने त्या सवंगड्यांना सतरावी जीवन कळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *