ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.९४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९४

पदपदार्थ संपन्नता । व्यर्थ टवाळी कां सांगता । हरीनामी नित्य अनुसरता । हें सार सर्वार्थी ॥ हरिनाम सर्व पंथी । पाहावे न लागे ये अर्थी । जे अनुसरले ते कृतार्थी । भवपंथा मुकले ॥ कुळ तरले तयांचे ।

जींही स्मरण केलें नामाचे । भय नाहीं त्या यमाचे । सर्व ग्रंथी बोलीयेलें ॥ नलगे धन नलगे मोल । न लगती कष्ट बहुसाल । कीर्तन करितां काळ वेळ । नाहीं नाहीं सर्वथा ॥ हरि सर्व काळ अविकळ ।

स्मरे तो योगिया धन्य केवळ । त्याचेनि दर्शन सर्वकाळ । सुफळ संसार होतसे ॥ ज्ञानदेवीं जप केला । मन मुरडुनी हरि ध्याईला । तेणें सर्वांगी निवाला । हरिच जाला निजांगे ॥

अर्थ:-

वेदांची पद संपन्न आहेत पण व्यर्थ त्यांची टवाळी का सांगायची हरिनामाला नित्य अनुसरले तर त्याचे हे सार सर्वार्थाने आहे. वैदिक धर्माच्या अनेक पंथात हरिनामाचे महत्व सांगतात व त्यामुळे एकच शास्त्रविचार आहे तो म्हणजे हरिनाम व ज्यांनी तो विचार अनुसरला

ते कृतार्थ झाले व भवपंथात अडकले नाहीत.ज्यांनी हरिनामाचे स्मरण केले त्यांना यमाचे भय राहिले नाही त्यांची कोटीकुळे तरली असे ग्रंथ उच्चारवाने सांगतात.हरिकीर्तनाला ना धन लागते ना मोल द्यावे लागते व कष्ट ही करावे लागत नाहीत. त्या हरिनामात कोणतेही व्यंग

नाही व जे योगी ते घेतात ते धन्य होतात. त्यांचा संसार सुफळ होऊन त्यांना नित्यदर्शन प्राप्त होते.ज्याने मनाला मुरड घालुन हा जप केला तो सर्वांगाने निवाला नव्हे नव्हे हरिरुप झाला असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *