ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.297

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९७

आपीं आप माये तेजीं तेज समाये । पवनीं पवन माये पृथ्वी जाये ॥१॥
हंस कोठे गेला तूं पाहो विसरला । भ्रमेंचि भलला कोहं शब्दें ॥२॥
सांडी तू रे जाती होई रे विजाती । येणें रुपें समाप्ती प्रपंचाची ॥३॥
ज्ञानदेवा घर विठ्ठल आचार । वेंगी पर पार हंस पावे ॥४॥

अर्थ:-

पाणी पाण्यात, तेज तेजात, वायु वायुत व पृथ्वी पृथ्वीत लय पावली. हंस कोठे गेला? किंवा देह वियोग झाला असता त्यातील परमात्मा कोठे गेला याचा विचार करायचे सोडुन मी कोण आहे. या विचाराच्या भ्रमात पडला आहेस.

या करिता मी मनुष्य आहे. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. अशा तऱ्हेचा जातीचा अभिमान जातिरहित जो परमात्मा त्याचे स्वरुप हो म्हणजे तुझ्या प्रपंचाची समाप्ती सहज होईल. अशा रितीने आत्मानात्मविचार करुन माया कार्य

पदार्थाचा निरास करुन आपले स्वस्वरुप जाणणारे जे मुमुक्षुरुपी राजहंस आपले मूळच्या स्वरुपचा आधार म्हणजे, श्रवण मननादिक करुन संसाराच्या पैलतीराला पोहोचले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *