ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.265

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६५ 

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाही तरी संसारु वायां जाईल रया ॥ कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत् जाईल रया ॥

विषयाचे समसुख बेगडाची बाहुली । अभ्राची साउली जाईल रया ॥ ज्ञानदेव म्हणे पहता पाहिलें । स्वप्नीचे चेईले जाईल रया ॥

अर्थ:-

मनुष्य जन्मात आल्यानंतर जीवाने शारंगधराच्या भक्तीकडे वळावे तो जर संसाराच्या नादी लागला तर मनुष्य देह वाया जाईल. संसारातील मायबाप, गणगोत हे जरी आपले वाटले तरी मृगजळाप्रमाणे विरुन जातात

. बेगडाच्या बाहुलीचा रंग, आकाशातील ढगांची सावली क्षणभर असते तसे विषयातील सुख आहे. स्वप्नातील सुख जागृतीत नष्ट होते त्याप्रमाणे पाहण्याचे पहाणे जाईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *