ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.261

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६१

मलयानिळ शीतळू । पालवी नये गाळूं । सुमनाचा परिमळु । गुंफिता नये ॥ तैसा जाणा सर्वेश्वरू । म्हणों सानाथरू । स्वरूपांचा निर्धारू ।

कवण जाणे ॥ मोतियाचें पाणी भरतां नये राजणीं । गगनासी गवसणी । घालिता नये ॥ डोळ्यांतील बाहुली । करिता नये वेगळी ।

सखी म्हणा अंचुळी । धरितां नये ॥ कापुरांचे कांडण । काढितां नये आड कण । साखरेचे गोडपण । पाखडतां नये ॥ विठ्ठलरखुमाईचे भांडण । कोण करील बुझावण । निवृत्तिचें चरणीं शरण ज्ञानदेव ॥

अर्थ:-

मलयगिरी पर्वतावरिल शितळ वारा जसा गाळुन घेता येत नाही. तसा फुलाचा सुगंध हा गुंफता येत नाही. तसे कोणालाही सर्वेश्वर म्हणु शकत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही.

गगनाला गवसणी घालता येत नाही. डोळ्यातील बुबळ वेगळे करता येत नाही. व मैत्रीण जरी असली तरी तिची अंचुली मागता येत नाही. कापराचे कांडण करुन कण काढता येत नाही.

साखरेची गोडी पाखडता येत नाही. त्या प्रमाणे विठ्ठल रखुमाईतील भांडण कोण सोडवणार. म्हणुन मी माझे श्री गुरु निवृत्तिनाथांच्या चरणी शरण जातो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *