ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.247

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४७  २४७

सुखाचिया गोठी आता किती हो करणे । सुखें सुख अनुभवणें ऐसे करी ॥ पढियंते बाईये गुणेवीण हातां नये । साचेवीण सये तेथे आवडी कैंची ॥

कैसेनि कीजे मनासी रक्षण । भावासी बंधन केवीं घडे ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरे । सुखीं सुख मुरे ऐसे करी वो बाईये ॥

अर्थ:-

आतां नुसत्या सुखाच्या पोकळ गोष्टी किती कराव्या? त्यापेक्षा सुखाने सुखाचाच अनुभव घेता येईल असा प्रयत्न कर. परमात्म्या विषयी खरे प्रेम उत्पन्न झाल्यावाचून तो हाती सापडणार नाही ग बाई आणि खऱ्या अनुभवा शिवाय

परमात्म्याविषयी आवड उत्पन्न होणार नाही. मनाला मनाप्रमाणे वागू देऊन भावाचे बंधन घालता येणार नाही. माझे पिता हे सखी रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच पुरेत. त्याच्या चरणावर सुख नुरेल असे कर.असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *