ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.243

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४३

सुढाळ ढाळांचे मोती अष्टे अंगे लवे ज्योती । जया होय प्राप्ति तोचि लाभे ॥ हातीचे निधान जाय मग तू करिसी काय । पोळलियावरी हाय निवऊ पाहे ॥

अमृतें भोजन घडे कांजी याने चूळ जोडे । मग तये चरफडे मिती नाहीं ॥ अंगा आला नाही द्यावो तंव ठाकी येक ठावो । बापरखुमादेविवर विठ्ठल नाहो ॥

अर्थ:-

पाणिदार सुढळ मोती जसे असावे त्याप्रमाणे हे मनुष्य शरीर जीवास प्राप्त झालेले आहे. मनुष्य शरीरच भगवत् प्राप्तीचे साधन आहे. ते जर केले नाही तर हा मनुष्य शरीररुपी ठेवा हातातून एकदा का गेला तर तू काय करणार?

पोळल्यानंतर हाय हाय करण्याचा काय उपयोग.दुसरे असे की वेळ अमृताचे भोजन मिळण्याचा योग आला व गेला आणि नंतर चूळभर भाताची पेज पिण्याचा जर प्रसंग आला तर नुसते मनातल्या मनांत

चरफडत बसावे लागेल याशिवाय दुसरा उपाय काय आहे. याकरिता मृत्यूचा घाव अंगावर आला नाही तोपर्यतच जगाचा अधिपती जो रखुमादेवीचा पति व माझे पिता श्रीविठ्ठल त्याची प्राप्ती करुन घे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *