ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.281

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८१

दिव्य औषधीची वार्ता ऐकोनियां कानी । व्याधी टाकी तनु ।
धालियाचे सुख भुकेला केवी जाणे कैसे निवे त्याचे मनु रया ॥
सुखाचा अनुभव कैसेंनि जाणावा । भेटींचे आर्त सकळांसही सारिखें होईजे देखा ॥
आपण जालिया जागा नलगे सांगावे । बापरखुमादेविवर विठ्ठल भेटलिया ।
तरी तुझी तुटतील सकळिक विंदाने रया ॥

अर्थ:-

एखाद्या दिव्य औषधाची नुसती वार्ता ऐकल्याने देहाचा रोग नाहीसा होतनाही. जेऊन तृप्त झालेल्या मनुष्याचा आनंद भुक लागलेल्या मनुष्याला कळणार नाही. एकाच्या सुखाचा अनुभव दुस-याला कसा येईल.

या करता जिवशिवाचे ऐक्य करून तो अनुभव पहावा म्हणून सुखाचा अनुभव ज्याचा त्यालाच झाला पाहिजे. व तो जीव शिवाच्या ऐक्याने होणारा आनंद सर्व मुमुक्षुस होईल. कारण आपण जागे झालो हे सांगयला लागत नाही. कारण त्याचा अनुभव त्यालाच असतो. रखुमादेवीचे पती व माझे पिता जे श्रीविठ्ठल त्याची भेट झाली तर तुझी सर्व संसारिक दुःख नष्ट होतील. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *