ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.238

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३८

चितिले अपैसे । पाविजे सायासें । तरी कामा नसे । सायास या ॥१॥ देखणे स्वप्नींचे । भुररें मायेचे । भ्रमित देहाचे हरिवीण ॥२॥ आयुष्याचे पेठे ।

संसाराचे तट । गुरुवीण वाट । कैंची रया ॥३॥ त्रिपुटिसी वर्ते । वैकुंठ सरतें । प्रेमेवीण भरितें । कैसे येत ॥४॥ ज्ञानदेवी घर । केले पै सपुर । संसार येरझार हरिचरणीं ॥५॥

अर्थ:-

मायाकार्य अनात्म पदार्थाचे चितंन केले असतां म्हणजे त्याची उपेक्षा केला असता ते जर सहजासहजी प्राप्त होत असतील तर त्याकरिता मोठे कष्ट करण्याचा गरज नाही. असे असले तरी ते अनात्म पदार्थ स्वप्नातील पदार्थाप्रमाणे आहेत. परंतु मायायोगाने भुरळ पडल्यामुळे देहाच्या ठिकाणी सत्यत्वाने ते भासत असतात. म्हणजे देहाला सुखोपभोगी वाटत असतात.

त्यातून सुटण्याची वाट सद्गुरु वाचून कोण दाखविणार. संसाराच्या तटात आयुष्यभर साह्य करणारा दुसरा कोण आहे. तो श्रीहरि जागृती स्वप्न व सुषुप्ती या त्रिपुटीत नित्य आहे. पण त्याच्या ठिकाणी प्रेम असल्या शिवाय अंतःकरणात प्राप्ती कशी होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी माझ्या शरिरात श्री हरिचे मोठे स्थान करुन जन्ममृत्युरुप संसाराची येरझार हरिचरणी संपवली.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *