ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१५९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १५९

धर्म वसे जेथें । सर्व कार्य होय तेथें । पित्यासहित मनोरथे । सिद्धि पावेल सर्वथा ॥ धन्य धन्य पितृवत । धन्य धन्य धर्मकृतार्थ । धन्य धन्य वेदाचा मतितार्थ ।

रामकृष्ण मुखींनाम ॥ जंववरी आयुष्य आहे । तंववरी हरीची सोये । हरि हरि मुख राहे । तो सुखी होय अंती देखा ॥ ज्ञान ध्याने निवे संध्या । ज्ञान विज्ञान हाचि धंदा ।

रामकृष्ण हरि मुकुंदा । परमानंदा जगद्गुरू ॥ ज्ञानदेवें सुकाळ केला । हरि हृदयी साठविला । हरिपाठ हाचि साधिला । अनंत अनंत परवडी ॥

अर्थ:-

ज्या ठिकाणी धर्माचरण असते तेथे सर्व कार्य निर्वेध होतात पितरांच्या इच्छा पूर्ण होतात व सिध्दी ही प्राप्त होते. ज्या मुखी रामकृष्ण नाम आहे त्या पितृव्रत धर्मकार्य धन्य होते व तोच खरा वेदांचा मतितार्थ जाणतो.

ज्या मुखात सतत हरि आहे असे आयुष्य जगणारा तो अंती ही सुखीच राहतो. रामकृष्ण हरि मुकुंद ह्या नामोच्चरणा बरोबर त्याची संध्यादी कर्म संपुन जातात. अशा पध्दतीने हरिपाठ करणारे हरिला हृदयात साठवतात व त्यांच्या साठी ब्रह्मविज्ञेचा सुकाळ होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *