ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.239

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३९

धरसील तरी हाती लागे बापा । सोडसील तरी जाईल दिंगतरा ॥ जतन करी रे जिवाचीया जिवा । सांगतसे ठेवा जुगादीचा ॥

निवृत्ती निरोप बुझे आपेंआप । आधि पुत्र मागे बाप जन्मे रया ॥

अर्थ:-

ज्ञानाच्या साह्याने परमात्म्याला धरावयास गेला तर तो परमात्मा तुझ्या हाती लागेल व धरण्याचा प्रयत्न सोडून दिला तर तो दूर जाऊन तुला सापडणार नाही. हे मी तुला माझ्या ठिकाणचे गुह्य ज्ञान सांगतच आहे

म्हणून तो ठेवा जीवापेक्षाही आवडीने जतन कर. माझ्या श्रीगुरु निवृत्तीरायाचा हा निरोप तुझ्याठिकाणी ठसला तर अगोदर पुत्र नतर बाप म्हणजे प्रथम ब्रह्मात्मबोध व नंतर ब्रह्मप्राप्ती होईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *