ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.236

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३६

कामारिकरुणा करुणार्णव झोंबे । करुनियां बिंबे अलिप्तपणें ॥ कामधाम हरि ब्रह्मार्पण करी । आपणची कामारी होये हरी ॥

चक्षुपक्षपादयुगळ अधिष्ठान । हरिवीण श्रवण करु नको ॥ ज्ञानदेव सोहं मंत्र तंत्र ध्यान । मनाचे उन्मन हरिपायी ॥

अर्थ:-

करुणेचा समुद्र असलेला श्रीहरि. आपल्या भक्तावर दया करुन अलिप्तपणाने त्यांच्या हृदयांत बिंबतो. भक्तांनी आपले कामधाम भगवंताला अर्पण केले असल्यामुळे श्रीहरिच भक्ताचा नोकर होऊन त्यांची सर्व कामे करत असतो.

असा तो भगवान उदार व ऐश्वर्यवान आहे. म्हणून आपल्या चक्षुरादि इंद्रियांना अधिष्ठान एक श्रीहरिच करा.सर्व इंद्रियांना त्याच्याकडेच लावा. त्याशिवाय तुम्ही काही बोलूच नका. माझे मंत्र, तंत्र, जप, ध्यान वगैरे सर्व कांही परमात्माच आहे. त्यामुळे माझ्या मनाचे उन्मन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *