ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.314

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१४

व्रतें तपें तीर्थे तंवचि वरी गर्जते । जंव देखिलें नाही तुवां तूंते । जेथे वेदा मौन्य पडे । श्रुति नेति नेति म्हणोनी बहुड़े । ते सुख वाडे कोडें । भोगिजेसु ॥ नाही आपण पैं सौरसु । कां करिसी हव्यासु । लटिकाची मायाभासु । मिथ्या भमु ॥ सिद्धचि असतां करिसी साधनाची चाड । सुख सांडूनि दुःख वाड । भोगितोसी रया ॥ या विश्वायेवढा जगडंबरु पसारा । देखोनियां सैरा । मन धांवे तुझे ॥ मृगजळ देखोनी मृगे आली टाकोनी । जीवन म्हणौनि तान्हा फुटोनि मेलीं ॥ आतां तुज नलगे कष्टावें । जे असेल स्वभावे । नेमिले देवे ते न चुके

ब्रह्मादिकां ॥ उमप सांडूनि करिसी दैन्याचे डोहळे । निधान देखोनियां डोळे । वायां झाकू नको ॥ थोडे हे सांडी परौतें । बहुत ते घेईजे अरौते । जे चाळिते तूते आणि विश्वाते ॥ मागे जे केले तें । अवघें यांतूचि निमाले । आतां पाहाता तुझियेनि बोलें रया ॥ पुत्र कलत्र वित्त हो तो मिथ्या मोहो । आतां साचि वावो मानेल तुज । नखापासूनि शिखा व्यापूनियां आहे । बापरखुमादेविवरु विठ्ठलु हृदयीचा । ध्यायी सुखें रया अधमुक्त रया ॥

अर्थ:-

तीर्थयात्रा यांचे महत्व तोपर्यतच आहे

जोपर्यंत आत्मज्ञान झाले आत्मस्वरूपाविषयी वेद मान धारण करतो श्रुति न इति नइते असे इन फिरते, अशा स्वरुपाची असलेला अमानंद भागोत अवरुपाविषयी आस्था न बाळगता मिथ्या मायेचा भूमात पडून उगाच साधनाचा हव्यास करतोस् आत्मा हे तुझे स्वरुप आहे. असे असता त्याचे करता अन्यसाधनाची खटपट केलोस तर स्वरुपभूत सुखाला आंदवून महान विनाकारण तू भोगत आहेस

हे जगताचे अवडंबर बघून ते सत्य किंवा सध्या हा विचार न करता तू स्वैर धावतो आहेस जसे तहान भागविण्याकरिता पाणी समजून मृगजळाकडे धावत जाणारी हरिण फुकट मरते तसे हे तुझे मन धावत आहे. वास्तविक तुला अन्यसाधनामध्ये कष्ट करण्याचे कारण नाही ते असे म्हणशील की शरीर निर्वाहाकरीता कष्ट केले पाहिजे परंतु ते तुझे म्हणणे चुकीचे आहे कारण प्रारब्धबलाने ज्याचे अन्नोदक जेथे असेल ते ब्रह्मदेवालाही चुका नाहीत अमर्याद परमात्मसुख सोडून विषय सुखाची इच्छा होणे

म्हणजे तुला दरिद्रीपणाचे डोहळेच होत आहेत. अरे, प्रत्यक्ष ठेवा समोर असता डोळे झाकण्याची हो दुर्बुद्धी तुला कां होते म्हणून क्षुल्लक असलेले हे विषयसुख टाकून अमर्यादि असे आत्मसुख त्याचा उपभोग घे, ज्याच्या सत्तेवर तू व जगत चाललेले आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी मागील सर्व संचित कर्म लय पावते. तुझ्या दृष्टिने बंधमोक्ष असले तरी त्या दोन्हीही अवस्था तुझ्या आत्मस्वरुपाच्या ठिकाणी नाही. परंतु तुला बायको, मुलगा पैसा यांच्याविषयी निष्कारण मोह आहे परंतु तू जर आत्मचिंतन केलेस तर हा मोह मिथ्था आहे असे तुला समजून येईल तुझ्या शरीरांत नखशिखांत व्यापून राहिलेला रखुमादेवीचे पती व माझे पिताश्री विठ्ठल ते तुझ्या ह्रदयांत अखंड वास करीत आहेत त्याचे ध्यान सतत करीत जा.असे माऊली सांगतात..

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *