ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.311

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३११

अमोलिक रत्न जोडलें रे तुज । कां रे ब्रह्मबीज नोळखसी ॥
न बुडे न कळे न भीये चोरा । ते वस्तु चतुरा सेविजेसु ॥
ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडलें । आणुनी ठेविले गुरुमुखीं ॥

अर्थ:-

अरे, जीवा मनुष्य देहासारखे अमोलिक रत्न तुला प्राप्त झाले असताना.तु ब्रह्माला का ओळखत नाहीस. ते ब्रह्मस्वरुप पाण्यामध्ये बुडत नाहीं अज्ञानी लोकांना कळत नाही. जे लाभले असता चोरांची भिती नाही.

अशी बह्मवस्तु हे शाहण्या तू त्या वस्तुचे सेवन कर.गुरुमुखातुन ब्रह्मद्ञान श्रवण केल्यामुळे ती अविनाशी वस्तु मला मिळाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *