ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.215

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१५ 

परद्वीपींहूनि सूक्ष्म मागे आलासी पवनवेगें । बिंदूनियां नवमासवरी । पेणे केलें मातापुरी । सोहं सोहं परी परतेचिना ॥ निर्लज्जा रे तुज शिकवुं किती ।

न गमे दिनराती बळिया देवो ॥ त्या येऊनिया वाटा तुज ऐसें गमलें । कोई कोहं ठेले प्रकाशत । पुसुनिया तळवरी सूतलासी मळ घोर ।

क्षुधा आड उरी आदळली ॥ ऐशी बाळपणीं सांकडी बहु ठेलीं झडाडी । सडाडा वोसंडी शांती सैरा । तारूण्याचेनि भरें वित्त विषयचोरें ।

बांधिलासी संसारे हालों नेदिती ॥ ऐसा वोस मार्ग पुढे अवला वेळु पाहला । वारितां वारितां निघाला मारिजसी । पुढे पडलीसे वाट ते ऐक रे बोभाट ।

परतले धायवट अर्धजीवें ॥ ऐसे पायाळ पुढे गेले पांगूळ मागें ठेले । पैलतीर पावले परम तत्वेंसी ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु सैरा रे सावधु । ज्ञानियाप्रसिद्ध उपदेशितु ॥ परद्विपापाहून म्हणजे पूर्वशरीराला

अर्थ:-

सोडून,सूक्ष्म मागनि बिंदुरूपाने नवमास गर्भावस्थेत पवनवेगांने आलास. ‘सोऽहं सोऽहं’ याचा उच्चार करीत असतो, पण जन्म झाल्यावर मात्र ते सर्वविसरून जातोस.हे निर्लज्जा जीवा तुला शिकवावयाचे किती संसाराच्या धांदलीत रात्रंदिवस चैन पडत नाही

.आणि त्या वाटेने येऊन ‘कोऽहं कोऽहंअसे म्हणात त्या अवस्थेत मलमूत्रामध्ये लोळत पडून, भुकेने व्याकुळ होऊन आलास अशा रितीने बाळपण गेले तारूण्याच्या भरात वित्तादि विषय यांनी संसारात तुला बांधून टाकल्यामुळे तु हालचाल ही करु शकला नाहीस

व शांती ही गमवलीस.अशा कष्टमय मार्गात बहुत काळ घालवात असतांनाच पुढे मरून जातो. असा हा दुःखमय संसार करण्यापेक्षा संतांनी उपदेश केलेल्या परमार्थाच्या वाटेला लागअशा रितीने धैर्य धरून कांही परमार्थाकडे पाऊल टाकलेते परमतत्त्वाला गेले.

आणि त्यामार्गाविषयी धैर्य न धरणारे पांगळे ते मागे पुन्हा संसारात राहिले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल आशा जींवाना सैराट न होता सावध व्हा असा उपदेश करतात असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *