ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.209

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०९ 

शाहूणे सिंतरे व्याहाणे मोहरें । भणंग धुरे आतुडे कैसें ॥ या अवचित्या गोष्टी भाग्ये होय भेटी । प्रारब्ध सृष्टी भोग देत ॥

येत जात वाटा शरीरी भरे फांटा । मदमत्सर ताठा भ्रमकुळीं ॥ ज्ञानदेवो म्हणे या खुणे मी नेणें । पंढरीचे राणे उगविती ॥

अर्थ:-

शहाण्या मनुष्याने संकटात पडणे, मूर्ाखनि श्रेष्ठत्वास पावणे, दरिद्री ऐश्वर्य संपन्न होणे या गोष्टी सहसा संभवत नसल्या तरी प्रारब्धाने एखादे वेळी घडून येतील.प्रारब्धामुळे सृष्टीतील भोग भोगावे लागत असल्यामुळे, या गोष्टी

अवचितपणे होतीलही. आत्मस्वरूपांच्या वाटेस लागता शरीराच्या आडफाट्यांवर म्हणजे शरीरावर आत्मबुद्धी होते तसे झाले की मदमत्सरांचा ताठा भरलाच म्हणून समजावे. ती अविद्या होय. पंढरीचे राणे अवतरले की अविद्या नाशाची खुण आत्मस्थिती सापडते असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *