ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.180
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८०
परब्रह्म सांवळे । गोपवेशें निराळे । हदयकमळी स्थिरावलें । काय सांगो ॥
काया वाचा मनें । पाहे जों पाहाणे । तव नवलाव होया । निर्गुण रया ॥
नामरूप गोडी । हेचि आवडी आतां । न विसंब सर्वथा । तुजलागीं ॥धृ॥
जगड् व्याळ प्रपंचभान । हे तुज नातुडे हन । वाया भोगिसी जाण । काय रे याचे ॥
तुझीच बुंथी तुज । न कळे याचें चोज । केवीं वर्णिसी सहज । गुणे रया ॥
म्हणोनि दृष्टी । चोरुनि पडे मिठी । मन चोरुनि या पुढतपुढती । तुजचि माजीं ॥
बापरखुमादेविवरा । विठ्ठला उदारा । येणेचि नाही त्रिशुद्धि । येणें निवृत्तीराये खुणा ।
दाऊनिया सकळ गुणी गुणातींत । तुटली आधी रया ॥
अर्थ:-
काय सांगु ते गोपवेशातील सावळे परब्रह्म माझ्या हृदयकमळात स्थिरावले आहे. काया वाचा मनाने त्याला पहायला गेले तर नवल झाले ते निर्गुण असल्याचे जाणवले. त्यामुळे फक्त तुझ्या नाम व रुपाची गोडी धरुन फक्त तुझ्यावर, इतर ठिकाणी न जाता विसंबलो आहे. ह्या जगडंबर प्रपंचाचे तुला भान नाही आवड नाही तरी तो तु भोगत असतोस हे
समजत नाही. हे सगुणरुप ओढुन घेतलेले रुप तुलाच कळत नाही.त्याचे वर्णन कसे करायचे हे सुचत नाही. त्या करिता सगुणच्या साहय्याने तुझे निर्गुण स्वरुप जाणावयास वाटत आहे.
माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे उदार आहेत.त्यांच्या पाशी त्रिशुध्दी असुन सर्व गुण असुन गुणातीत ही तेच आहेत अशी खुण निवृत्तीनाथांनी दाखवली माझी चिंता तोडली असे माऊली सांगतात.